घूमर फिल्म रिव्ह्यू | माझ्या क्रिकेटच्या आठवणी

‘घूमर’ चित्रपटाचा प्रीमियर पाण्याची संधी मिळाली. बायकोच्या Genepath कंपनीने खास शोचे सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजन केले होते. नावावरून नृत्याशी संबंध वाटत होता, पण चित्रपट सुरू होण्याआधी कळाले की विषय क्रिकेट आहे. क्रिकेटवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेलेत त्यामुळे त्यात नवीन एकाची भर आणि premier शो पाहून आलो असे मिरवायला मिळेल असा विचार करून चित्रपट सुरू होण्याची वाट पाहू लागलो… सुरवातीस चित्रपट पकड घेत नाही, शॉर्ट फिल्म पाहायला लागते की काय असा विचार डोकावला. परंतु थोड्याच वेळात अभिषेक बच्चनची एन्ट्री होते आणि त्यानंतर जसे एखादा हरत आलेला क्रिकेट सामना अचानक कलाटणी घेतो त्याप्रमाणे चित्रपट एक जबरदस्त वळण घेतो आणि त्यानंतर अंगावर शहारे आणणारे, अभिनयाचा कस लागणारे, उत्कंठावर्धक दृश्ये समोर येऊ लागतात…

R Balki चित्रपटाचे दिग्दर्शक. त्यांचे गाजलेले चित्रपट English Vinglish, Padman, Mission Mangal अश्या प्रतिभावंत दिग्दर्शकाची अजून एक सुंदर चित्रकृती. अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, जबरदस्त संवादफेक. मुख्य नायिका Saiyami Kher अभिनय थक्क करणारा आहे. खरच आपण नायिकेला पाहतोय की एखाद्या मुरलेल्या खेळाडूला पाहतोय असा संभ्रम निर्माण होतो. शो नंतर एकाने तिच्या क्रिकेट स्किलबद्दल विचारले तेव्हा तिने मला महाराष्ट्र क्रिकेटमध्ये निवडीसाठी जायला आवडेल असे सांगितले. हा चित्रपट पाहून खुद्द मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रश्न पडला होता की यामध्ये VFX चा वापर केलाय का? मला आवडलेला डायलॉग ‘लेफ्ट से भी ANINA राईटसे भी ANINA’. मोटिव्हेशनल डायलॉगची रेलचेल आहे… तेव्हा माझ्याकडून Must Watch 👍

एका विशेष कारणाने हा चित्रपट माझ्यासाठी खास होता कारण घुमर म्हणजे स्पिन बॉलिंग (फिरकी गोलंदाजी) 🏏. क्रिकेटमध्ये तशी ही जमात अल्पसंख्यांक आहे. मला आठवते शाळेत सहावीत आम्ही फुलपीच क्रिकेट खेळायला लागलो आणि सुरुवातीपासूनच माझा ओढा स्पिन बॉलिंगकडे होता. आधी लेग स्पिन आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ऑफ स्पिन करू लागलो. मित्र मला फेकी म्हणायचे पण नंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कोचने माझ्या बॉलिंग स्टाईलची निर्दोष मुक्तता केली होती 😎 टेनिस बॉलवरील सामने असायचे त्यामुळे बॉलिंगसोबत मला विकेट किपिंग सुद्धा आवडायची आणि विशेष म्हणजे किपरने बॉलिंग करू असा नियम नसल्याने दोन्हीचा आनंद घेता येत होता. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षी इंटर डिपार्टमेंट सामन्यांमध्ये विकेट किपिंग इतरांना चांगली जमत नसल्याने ती जबाबदारी माझ्यावरच आली पण पुढे करियरवर हाच शिक्का बसेल याची कल्पना नव्हती. इंटर डिपार्टमेंट Tournament आम्ही जिंकली आणि आणि त्यानंतर लागलीच कॉलेजची टीम निवडण्यात आली. माझा performace चांगला झाल्याने कॉलेज टीमचा विकेट किपर म्हणून निवड झाली आणि बॉलिंग करण्याचे मार्ग बंद झाले… पुढे इंटर कंपनी मॅचेस मध्येही कीपर म्हणूनच खेळावे लागले. Cognizant मध्ये असताना मात्र निवडीसाठी जाताना मी किपर होतो हे लपवले आणि स्पिन बॉलर म्हणून सिलेक्ट झालो. प्रॅक्टिस सेशन मध्ये MCA च्या कोचने माझी Action unique आहे तेव्हा प्रॅक्टिस सोडू नको असा सल्ला दिला होता. आवडीच्या क्षेत्रात पुन्हा पदार्पण करता आले याचे समाधान वाटले… शेवटचे खेळलो L&T Infotech मध्ये. आयटी करियरची गाडी पुढे जाताना क्रिकेट मागे पडत गेले… आता कधीतरी घराजवळील धिंग्रा मैदावर गेल्यावर कोणी खेळताना दिसले की मध्ये घुसून काही बॉल टाकायचे समाधान मिळवायचे बस्स… 🙂

Ghoomer R. Balki Saiyami Kher Abhishek Bachchan Vikram Sathaye #Cricket #Spinner

इंद्रायणीथडी जत्रा 2023 | देशातला सर्वात मोठा महोत्सव

हुश्श्श…

महोत्सवाचे पाच दिवस संपले! 24 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी भेट देणारा हा इंद्रायणी थडी चा सोहळा अतिशय संस्मरणीय ठरला. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे हा राज्यातला नव्हे तर देशातल्या सर्वात मोठ्या महोत्सवापैकी एक म्हणून इंद्रायणी थडी आता ओळखली जाईल. याचे सर्व श्रेय जाते पिंपरी चिंचवडचे कार्यकुशल आमदार महेशदादा लांडगे यांना.

◾कसा झाला 2023 चा हा भव्य सोहळा, संक्षिप्त आढावा

  • यंदा जत्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीने दर्शकांच्या मनाचा ठाव घेतला, • भक्तांसाठी राम मंदिरात अखंड भजन महोत्सव सुरू होते • प्रभू श्रीराम, छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आणि बैलगाडा शर्यतीची प्रतिकृती यांसमोर सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती, • प्रवेश करताच ध्यान आकर्षित करणाऱ्या ग्रामसंस्कृती मध्ये संपूर्ण वसवलेले गाव, बारा बलुतेदार व्यवस्था पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली दिसली, • तब्बल 17 एकर जागेवर भरलेल्या या महोत्सवामध्ये 1000 हून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यात आले या सर्व स्टॉलमधून सलग 5 दिवस नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला त्यामुळे सुमारे 20 हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला. यातून खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण व सक्षमीकरणाची प्रचिती मिळाली, • ऐतिहासिक शस्त्र व शूरवीर मराठे सरदारांचे शिल्प प्रदर्शन • उंदेरी खांदेरी जलदुर्गाची प्रतिकृती • पक्षनिष्ठा स्मारक जिथे महेश दादांनी स्वतःच्या आईचे व पक्षातील दिवंगत नेत्यांचे अर्धाकृती पुतळे उभारून आदरांजली वाहिली • भजन महोत्सव, • बाल गोपाळांसाठी 150 पेक्षा अधिक खेळणी असलेल्या मोफत बालजत्रेने बच्चेकंपनी खूष झाली, • युवावर्गासाठी नोकरी महोत्सव ज्यामध्ये 25 पेक्षा अधिक कंपन्यांनी भाग घेत ऑन द स्पॉट नोकऱ्या दिल्या, • महिला, जेष्ठांसाठी आरोग्य शिबीर ज्यामध्ये 12 हॉस्पिटलने सहभाग घेत 20 पेक्षा अधिक मोफत चाचण्या उपलब्ध केल्या. करमणुकीसोबत करीयर आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा, मार्गदर्शन हे सर्वकाही एकाच ठिकाणी अनुभवयास मिळाले…

महोत्सवाचे फोटो, व्हिडियो महेश दादांच्या फेसबुक पेजवर पहाता येईल facebook.com/maheshklandge

◾ केवळ 3 आठवड्यातले नियोजन
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महोत्सव आयोजन करण्याविषयी साशंकता होती परंतु दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर 7 जानेवारी रोजी सर्व कोअर टीमची मीटिंग कार्तिक आणि प्रसाद सरांच्या नेतृत्वात झाली आणि इथून पुढे सूरू झाला आमचा प्रवास. कमी वेळात महोत्सव कसा दिमाखदार करता येईल याबाबत सर्वांचे brainstorming झाले, अनेकविध कल्पना आणि त्याची व्यवहार्यता तपासून महोत्सवाची व्याप्ती अंतिम करण्यात आली. कोणाची काय क्षमता आहे हे अचूक हेरून प्रसाद सरांनी सर्वांना जबाबदारी वाटून दिली. कमी कालावधी, कारागिरांची उपलब्धता यांचा मेळ घालत आर्थिक नियोजन करणे खरेतर फारच आव्हानात्मक होते पण हि आघाडी कार्तिक सरांनी लीलया पेलली.

◾ करमणुकीचा नॉनस्टॉप जल्लोष
भव्य स्टेज आणि 5000 नागरीक बसू शकतील इतका भव्य मंडप यंदाचे खास आकर्षण ठरला. करमणुकीचे एकापेक्षा एक गाजलेले कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात आले. • खेळ रंगला पैठणीचा • महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर • डान्स जल्लोष – सिनेतारका नृत्य • झुंबा डान्स अश्या बहारदार कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वप्नील जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे, समीर चौगुले, गौरव, अश्या लोकप्रिय कलाकारांनी अफाट गर्दीची करमणूक केली, सोबतच अजित- सुजित, अक्षय घाणेकर यांच्या बहारदार गायकीने लोकांना मंत्रमुग्ध केले.

◾ मान्यवरांची भेट
उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित झाले, त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटिल, विश्व हिंदू परिषदेचे भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रप्रचारक अण्णा पंडित, पद्मश्री दादासाहेब इदाते, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त आयुष तापकीर, आंतरराष्ट्रीय गिर्यारोक गिरीजा लांडगे, शाहीर चेतन हिंगे, हिंदकेसरी अभिजित कटके, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ, कालीचरण महाराज, हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक धनंजय देसाई, गोरक्षक शिवशंकर स्वामी, संभाजी भिडे गुरूजी, शिवाजीदादा आढळराव पाटील, राहुलदादा कुल, कांचन कुल, शरददादा सोनवणे, सौ. उमाताई खापरे, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, अमरजी साबळे, शंकरशेठ जगताप आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. समारोपाच्या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हजेरी लावत उपस्थित जनसमुदायाला जोषपूर्ण भाषणाने उल्हसित केले. सर्व मान्यवरांना रामाची सुरेख मूर्ती देउन गौरवण्यात आले.

  • मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे भाषण इथे ऐका https://fb.watch/ipI_IV83h-/
  • उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे भाषण इथे ऐका https://fb.watch/ipJCPIywrs/

◾ विवीध कला कौशल्यांना वाव देण्यासाठी स्पर्धा
यंदा प्रथमच महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. 25 पेक्षा जास्त स्पर्धांचे नियोजन झाले होते परंतु काही कारणास्तव फक्त 15 स्पर्धा आपण घेऊ शकलो. महिला भगिनींसाठी फॅशन शो, मेकअप, फिटनेस, रांगोळी, मंगळागौर, एकपात्री, गायन, कविता, शिवकालीन मर्दानी खेळ तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस, स्मरणशक्ती, चित्रकला आदी स्पर्धा घेण्यात आला. यंदा प्रथमच 8 ऑनलाईन स्पर्धांचा समावेश करण्यात आला. स्वच्छ हाऊसिंग सोसायटी, चित्रकला, फोटोग्राफी, फूड ब्लॉगर, कराओके, रील स्टार, शॉटफिल्म या स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धांच्या समन्वयकांनी, परीक्षकांनी मागच्या काही दिवसांत अपार मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी पार पाडल्या त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. सर्व विजेत्यांना समारोपाच्या दिवशी ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम देउन गौरवण्यात आले तसेच स्पर्धा आयोजक, परीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

◾पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून #परीक्षापेचर्चा !
पिंपरी चिंचवड मधील 5000 पेक्षा जास्त मुलांसोबत परीक्षेबाबत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी थेट संवाद साधला. महेश दादांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची लिंक: https://fb.watch/ipIWFIFMl3/?mibextid=6aamW6

◾ सरकार आपल्या भेटीला
सरकारी विभाग आणि नागरिक यामध्ये दुवा साधण्यासाठी 15 पेक्षा अधिक सरकारी स्टॉलचे आयोजन करण्यात आले. जत्रेच्या मार्फत नागरीक आणि सरकार यांच्यात दुवा साधण्याचा महेश दादांचा उद्देश होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMPML, म्हाडा, RTO, पोस्ट ऑफिस, महावितरण, BSNL, रेशनींग ऑफिस, पोलीस आयुक्तालय, पंचायत समिती आदी सरकारी विभागांनी भाग घेत नागरिकांना सरकारी योजना, सेवा याबद्दल माहिती दिली.

◾ सामाजिक व अध्यात्मिक संस्थांचा सहभाग
शहरातील 35 पेक्षा अधिक सामाजिक व अध्यात्मिक संस्थांना स्टॉल देण्यात आले. त्याद्वारे विक्री, सभासद नोंदणी, जनजागृती करण्यात आली. अविरत श्रमदान , फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुनरुत्थाम गुरुकुलम, चिंचवड, तात्यासाहेब बापट स्मृती समिती, प्रकाशालय भोसरी, गो-सेवा विभाग, पिंपरी चिंचवड, पर्यावरण गतीविधी, भारतीय विचार साधना, घरकुल हॅंडीकॅप हेल्प ट्रस्ट, सेवा संकल्प प्रतिष्ठान, सेवादीप, रेलफॉर फाउंडेशन, मंथन फाउंडेशन, सह्याद्री प्रतिष्ठान, संस्कार भारती, TAYAOA कोल्हापूर, कार्डिअन करेक्ट फाउंडेशन, जुन्नर, डोनेट एड सोसायटी आदी संस्था सहभागी झाल्या

◾ #PCMCEatOuts द्वारे फूड स्टॉल व फूड ब्लॉगर स्पर्धेचे आयोजन
फूड फेस्टिवल हा जत्रेचा आत्मा. यावेळेस सुमारे 1000 स्टॉलपैकी 500 स्टॉल हे खाद्यपदार्थांचे होते. महाराष्ट्रातील विवीध भागांची खासियत असलेले व्हेज नॉनव्हेज असे हजारो पदार्थ खवय्यांना चाखायला उपलब्ध होते. यंदा प्रथमच PCMC Eat Outs या खाद्यप्रेमींच्या लोकप्रिय फेसबुक ग्रुपव्दारे दोन स्पर्धा घेण्यात आल्या 1) Food Stall Contest 2) Food Blogger Contest. ज्याला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

1) Food Stall Contest: 500 पैकी 150 स्टॉलधारकांनी स्पर्धेत भाग घेतला. पदार्थाची चव, स्टॉलची मांडणी, प्रेझेंटेशन नाविन्यता, नागरीकांचा प्रतिसाद हा निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. स्टॉलधारकांशी बोलताना जाणवले की अनेक महिला त्यांचा व्यवसाय घरातून चालवतात. यामागे त्यांची प्रचंड मेहनत, आवड आहे. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन पदार्थांचे कॉम्बिनेशन गिऱ्हाईकांना देण्याचा ते प्रयत्न करतात.

2) Food Blogger Contest: फूड स्टॉल स्पर्धेसोबतच PCMC Eat Outs चा आत्मा असलेले खाद्यप्रेमी मंडळींसाठी Food Blogger स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 50 पेक्षा अधिक ब्लॉगरने स्पर्धेत भाग घेत जत्रेतील खाद्यपदार्थ नेटिझन्सपर्यंत पोहचवले. लिहण्याचे कौशल्य आणि मांडणी या निकषावर मूल्यांकन करण्यात आले.

विविध महिला बचत गटांना व्यवसायाला मदत व्हावी या उद्देशाने PCMC Eat Outs ग्रुपद्वारे स्टॉलची फेसबुकवर मोफत जाहिरात करण्यात आली. त्यांना व्यवसायवृद्धीसाठी टिप्स देण्यात आल्या. इतक्या मोठ्या महोत्सवात स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल ॲडमिन टीम अमोल देशपांडे, शोएब शेख, पंकज कराड यांनी महेश दादांचे आभार मानले. तुम्ही जर स्वतःला खाद्यप्रेमी / Foodie मानत असाल तर आवर्जून हा ग्रुप जॉईन करा – PCMC Eat Outs #PCMCEatOuts

◾पोषण परसबाग मॉडेल व तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा स्टॉल
सोलापूरचे ख्यातनाम शेतीतज्ञ गुरुनाथ भांगे यांचे एक गुंठ्यांतील पोषण परसबाग मॉडेल ग्रामसंस्कृती मध्ये साकारण्यात आले. शहरी नागरिकांना छोट्याशा जागेमध्ये 30 पेक्षा जास्त भाजीपाला कसा पिकवता येईल याचे यशस्वी मॉडेल पाहता आले. जत्रा सुरू होण्यास कमी दिवस उरले असताना मी गुरूनाथ यांना संपर्क केला, व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्यांनी त्यांचे परसबाग मॉडेल दाखवण्यास होकार दिला याचा फार आनंद झाला. याचबरोबरीने त्यांनी संशोधन करून विकसित केलेली तृणधान्यांपासून तयार केलेली आरोग्यदायी खाद्यपदार्थ आईच्या सुयश महिला बचत गटामार्फत स्टॉलवर विक्रीला ठेवले होते. शेवगा, गवती चहा पावडर, भाजीपाल्यापासून बनवलेल्या 23 प्रकारच्या शेवया, ज्वारीचे बिस्किटे, ज्वारीचा चिवडा असे खाद्यपदार्थ विक्रिसाठी ठेवले होते. तृणधान्यापासून असेही पदार्थ बनवता येतात हे प्रथमच ऐकले. नेहमी विकत घेतो त्यापेक्षा वेगळे जरी असले तरी नागरिकांनी गवती चहा, बिस्कीट, चिवडा प्रत्यक्ष चाखून पाहिल्यावर त्यांना ते फार आवडले. यानिमित्ताने आईच्या बचत गटाला एक नवीन व्यवसाय संधी मिळाली. लवकरच यावर विस्तृत लिहिणार आहे.

◾ सोशल मीडियाचा पुरेपूर वापर
जशी इंद्रायणी थडी मैदानावर गाजत होती तसेच तिचा डंका सोशल मीडियावर फार दूर दूर पर्यंत वाजत होता. Views चा आकडा कोटींच्या घरात गेला. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल या सर्व समाज माध्यमांवर लोक भरभरून इंद्रायणी थडी विषयी पोस्ट करत होते. ज्यांना प्रत्यक्ष येणे जमले नाही त्यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे जत्रेचे सर्व क्षण अनुभवले. #IndrayaniThadi2023 आणि #MaheshLandge हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर होते. नेटिझन्सचा सध्याचा आवडता प्रकार म्हणजे Reels. अनेक लोकांनी क्रिएटिव्ह reels बनवून जत्रा सर्वदूर पोहचवली. पिंपरी चिंचवड फर्स्ट या फेसबुक ग्रुपने खास Reel Star हि स्पर्धा आयोजित केली त्याला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी 30 सेकंड्स मध्ये जत्रा कशी होती हे जाणून घ्यायचे असेल तर हा Reel पहा – https://bit.ly/it23-raunak-reel

◾ सोयीसुविधांचे परफेक्ट नियोजन
इतक्या मोठ्या महोत्सवाचे नियोजन व अंमलबजावणी करणे फारच जोखमीचे होते परंतु महेश दादांच्या टीमने ते यशस्वीरित्या पार पाडले. खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी जेवण बनवण्यासाठी स्टॉलबाहेर जागा, पाण्यासाठी वेगळी लाईन आणि ठीकठिकाणी नळाची सोय करण्यात आली. स्टॉलमध्ये कचरा होउ नये यासाठी ठिकठिकाणी Dustbin ठेवले होते. प्रत्येक जागेची साफसफाई सफाई कर्मचाऱ्यांमार्फत होत होती.

◾सुरक्षेची, पार्किंगची, पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था
सुरक्षेसाठी • 90 पेक्षा अधिक CCTV द्वारे 24X7 देखरेख • 120 पोलीस अधिकारी व 22 वाहतूक पोलीस तैनात • 300 पेक्षा अधिक स्वयंसेवकांची फौज तत्पर मदतीसाठी उपलब्ध होती. पार्किंग व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली. चारचाकी वाहनांसाठी 8 पार्कींग झोन निर्माण केले ज्याची एकत्रित क्षमता 1500 गाड्या होती तसेच 5000 पेक्षा जास्त दोनचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जत्रा स्थळाच्या भोवती चालण्यासाठी पदपथ आरक्षित करण्यात आले. वाहतूक पोलीसांचे विशेष कौतुक, त्यांनी बाह्य परिसरातील रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेऊन वाहतूकोंडी होउन दिली नाही. तसेच प्रवेशाच्या (Entry Exit) ठिकाणी लोकांची हालचाल नियंत्रीत केल्याने चेंगराचेंगरी झाली नाही.

◾ जिथे कमी तिथे आम्ही
सर्व स्वयंसेवक त्यांना नेमून दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडत होते पण जत्रा सुरू असताना अनेक छोट्या छोट्या कामांमध्ये जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण कार्यरत होता. प्रत्येक स्टॉल मध्ये काय हवं नको, त्यांच्या समस्या सोडवणे, कुठे बिघाड झाल्यास, व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास कोअर टीम तत्काळ दखल घेत होती. Entry Exit वर गर्दीला आवरणे, चौकशी कक्षात बसून ध्वनीक्षेपकावरून सूचना देणे, हरवलेल्या मुलाना सुखरूप त्यांच्या आई बाबांपर्यंत पोहचवणे, आलेल्या मान्यवरांना माहिती देणे अश्या असंख्य कामातून जत्रा माझ्यासाठी घर बनली होती. आठही हॉलमध्ये फेरफटका मारुन पाहणी करताना दगदग झाली तरी त्याचा त्रास होत नव्हता. जाता जाता वाटेत पडलेली प्लॅस्टिकची बाटली उचलून dustbin मध्ये टाकणे, मॅटिंग नीट करणे अशी कामेही लाज न बाळगता सहज केली गेली कारण हि जत्रा माझी आहे असे त्यामागचे भाव.

◾ तीन वर्षांचा आढावा
आयोजनाचे यंदाचे हे तिसरे वर्ष 2019, 2020 नंतर 2023 साली हि जत्रा भोसरी येथे भरली. कोरोनामुळे मधली दोन वर्षे जत्रा भरवता आली नाही.

  • दर्शक: 2019 (5 लाख) 2020 (6.5 लाख) 2023 (24+ लाख) • स्टॉल: 2019 (580) 2020 (800) 2023 (1000) • उलाढाल: 2019 (4.5 कोटी) 2020 (7 कोटी) 2023 (7.5 कोटी) हे इतके मोठमोठे आकडे गाठणे केवळ महेश दादांमुळे शक्य झाले. दरवर्षी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केल्यावर तो पुढच्या वर्षी मोडला जाण्याची किमया केवळ दादाच करू शकतात. जणूकाही त्यांची स्पर्धा स्वतःशीच असते. समारोपाच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसे “हा महेश दादा काहीही करू शकतो” म्हणजेच कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवण्याची धमक दादामध्ये आहे.

जत्रेबद्दलाचा तुमचा अनुभव कसा होता. जरुर कळवा आणि हो महेश दादा, इंद्रायणी थडीच्या पेजला टॅग करायला विसरू नका @maheshklandage @indrayanithadi

एव्हढे लिहून इथेच थांबतो ✍️
] अनमोल [

IndrayaniThadi2023 #IndrayaniThadi #MaheshLandge #PimpriChinchwad #Bhosari #Pune #PCMCFirst #इंद्रायणीथडी #जत्रा #foodfestival #punefoodie #pcmcfoodie #punefoodblogger #punefoodlovers Mahesh Landge Indrayani Thadi – 2023 Indrayani Thadi Pimpri Chinchwad First #PCMCFirst आम्ही पिंपरी-चिंचवडकर PCMC Eat Outs #PCMCEatOuts

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

 

डिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज
– अमोल देशपांडे, समन्वयक व संस्थापक । पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (PCCF)
– Email: md.amol@gmail.com | facebook.com/pccf.in


 

देशाचे पंतप्रधान माननीय नरेन्द्र मोदी २०१५ सप्टेंबर महिन्यातल्या अमेरिकेत सिलिकॉन वैलीमध्ये बोलताना म्हणाले पूर्वी शहरे नदीच्या किनारी वसली, त्यानंतर जिथे ‘हाय-वे’ म्हणजेच चांगल्या दळणवळणाच्या सोयी उपलब्ध तिथे शहरीकरण वाढले परंतु परिस्थिती बदलली आहे यापुढील काळात जिथे ‘आय-वे’ म्हणजेच Information Way उपलब्ध असेल तिथेच शहरे वसली जातील. यामधून आपल्याला बोध मिळतो तो म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्व. अन्न-वस्त्र-निवारा या जरी प्राथमिक गरजा असल्या तरी शहरांसाठी इंटरनेट सेवा बहुदा प्राथमिक गरज बनत चालली आहे. भारत सरकारने ‘डिजटल इंडिया’ उपक्रमाद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सरकार आगामी काळात काय उपाययोजना करणार आहे याबद्दल आराखडा मांडला. केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांबद्दल सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे http://www.digitalindia.gov.in/

डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प मांडला आणि त्यादिशेने विविध कामांची सुरवात केली. केंद्र, राज्यसरकारच्या धोरणाला समांतर असे शहराचे धोरण महापालिकेने बनवले पाहिजे त्यामुळे केंद्र-राज्य-शहर तिन्ही पातळीवर सुसूत्रता येउन त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यात होईल अशी मला खात्री वाटते. ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ असे संबोधून आपण हा विषय का व कसा महत्वाचा आहे यावर माहिती घेऊयात. केवळ महानगरपालिका गृहीत न धरता डिजिटल पिंपरी-चिंचवड उपक्रमात शहरातील सर्व शासकीय, निम-शासकीय सरकारी यंत्रणांचा सहभाग अपेक्षित आहे. जरी केंद्र/राज्य/शहर या वेगवेगळ्या पातळ्या असल्या, त्यांमध्ये विविध खाती असली तरी सामान्य नागरिकासाठी सरकार हे एकच असते. या नात्याने ‘डिजिटल पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवणे व्यवहार्य व सोयीचे ठरेल.

सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात Digital India म्हणजे नक्की काय? सोप्प्या भाषेत असा उपक्रम ज्यामुळे सरकारी सेवा, सुविधा लोकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सहज उपलब्ध होतील. केंद्र सरकार त्यासाठी अत्यावश्यक ऑनलाईन संरचना (Online Infrastructure) आणि इंटरनेट उपलब्धता (Internet connectivity) वाढवणे यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणार आहे. अधिकृतरित्या उपक्रमाची सुरवात देशाचे पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते १ जुलै, २०१५ रोजी करण्यात आली.

डिजिटल व्हिजन थोडक्यात: या उपक्रमाचे व्हिजन खालील तीन वर्गात विभागले आहे:

1. डिजिटल संरचना (Digital Infrastructure) प्रत्येक नागरिकाच्या उपयुक्ततेसाठी

  • वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करणे
  • प्रत्येक नागरिकाची स्वतंत्र, कायमस्वरूपी, ऑनलाईन आणि सुरक्षित पडताळणी करता येऊ शकेल अशी  डिजिटल ओळख प्रस्थापित करणे
  • मोबाईल फोन आणि बँक खाते यामुळे नागरिकाला डिजिटल व आर्थिक बाबतीत सहभागी होता येणे
  • सार्वजनिक सेवा केंद्राचा सहज वापर करता येणे
  • प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक माहिती, दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी Public Cloud मध्ये जागा उपलब्ध करणे
  • बिनधोक व सुरक्षित इंटरनेट वापर करता येणे

2. प्रशासकीय सेवा-सुविधांची मागणीनुसार उपलब्धता

  • सरकारी खात्यांचा कारभार, आंतरक्रिया एकमेकांना जोडलेले असणे   
  • सरकारी सेवा ऑनलाईन व मोबाईल माध्यमातून तत्काळ उपलब्ध करणे
  • नागरिकांना हक्क प्राप्त सुविधा, माहिती सोप्प्या पद्धतीने तसेच Public Cloud वर उपलब्ध असणे
  • उद्योग सुलभतेसाठी सर्व सेवा डिजिटल माध्यमात परावर्तीत करणे
  • आर्थिक व्यवहार  इलेक्ट्रॉनिक असणे म्हणजेच थेट पैसा हस्तांतर टाळणे  
  • GIS तंत्रज्ञानाचा निर्णय घेणे व विकास नियोजनात जास्तीतजास्त वापर करून यंत्रणा सक्षम करणे

3. नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण

  • डिजिटल साक्षरता व वापर वाढवणे
  • सार्वजनिक वापरासाठी डिजिटल माहितीकोश तयार करणे
  • डिजिटल ज्ञान भारतीय भाषेत उपलब्ध करणे
  • डिजिटल व्यासपीठ ज्यामध्ये लोकांना प्रशासकीय निर्णय, योजनांमध्ये सहभागी होता येणे

वरील त्रिसूत्रांवर आधारित शहराचे ‘डिजिटल व्हिजन’ तयार करणे हि पालिकेची प्राथमिकता असली पाहिजे. आयुक्तांनी यामध्ये विशेष लक्ष घालून ‘माहिती तंत्रज्ञान’ विभागामार्फत नियोजन आराखडा (Blue Print)  तयार करावा. डिजिटल इंडिया मिशन मध्ये महापालिकेचा सहभाग, भूमिका नक्की कशी असेल यावर आत्तातरी स्पष्टता नसली तरी आयुक्तांनी वरून आदेश येण्याअगोदर तयारीत राहावे ज्याचा फायदा नागरिकांना तर मिळेलच पण त्यामुळे आपले शहर देशातील इतर शहरांच्या तुलनेत अग्रेसर राहून ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करेल. चुकीने डावलले गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला केंद्राला १०० स्मार्ट सिटीमध्ये निवडावेच लागेल!

Include Pimpri Chinchwad in Smart City | Online petition www.change.org/p/include-pcmc-in-smart-city

डिजिटल पिंपरी-चिंचवड साध्य कसे? किंवा आपण खरेच त्यासाठी तयार आहोत का?

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराने मागील काळात नेत्रदिपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले देश-विदेशातील पुरस्कार हे त्याची साक्ष देतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी या आणि इतर अनेक पुरस्कारात सारथी, ई-गव्हर्नन्स सेवा, वेबसाईट या डिजिटल सेवांचा मोठा वाटा आहे. स्काडासारखी यंत्रणा यशस्वी राबवली गेली याच शहरात. देशभरातून सरकारी अधिकारी शहरातील उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी येतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे जरी खरे असले तरी केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आणि नव्या सरकारच्या सुधारित उपाययोजनांमुळे केंद्र/राज्य पातळीवर ई-गव्हर्नन्स मध्ये आमुलाग्र बदल घडले. केंद्राचे Mygov.in राज्याचे AapaleSarkar.in वेबसाईट तसेच LPG, IRCTC, BSNL सारख्या सरकारी सुविधा अत्यंत सोप्या, सुसह्य आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित झाल्याचे दिसून येते याचा थेट फायदा नेटीझन्सला झाला. एका वर्षात ई-गव्हर्नन्स चा बदललेला चेहरा पाहिल्यावर साहजिकच आपले शहर आत्ताच्या घडीला इतरांच्या तुलनेत कुठे आहे याचा फरक नागरिक करायला लागले आणि लक्षात आले शहराला एका वर्षापूर्वी ज्यासाठी पुरस्कार मिळाले तेच ई-गव्हर्नन्स त्याकडे योग्य लक्ष न दिल्याने जगाच्या मागे पडले. वर नमूद केलेल्या वेबसाईटशी आपल्या पालिकेच्या वेबसाईशी तुलना केल्यास अनेक त्रुटी साध्या डोळ्यांना दिसून येतील. मुद्दा वेबसाईट तुलना हा नाही परंतु पूर्वीच्या पुरस्कार अभिमानाच्या कोशातून बाहेर पडून पालिकेने जे नवे, प्रगत, प्रमाणित आहे अश्यावर आधारित ‘डिजिटल शहराची’ मुहूर्तमेढ करणे काळाची गरज आहे. स्मार्ट/बेस्ट सिटी पुरस्कार मिळाल्यामुळे खरेतर आपल्या शहराने जगभरातील प्रगत शहरांशी स्पर्धा करणे अपेक्षित आहे. एका खाजगी कंपनीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले कि इंटरनेट वापरात पिंपरी चिंचवड शहराचा देशात चौथा क्रमांक तर पुण्याचा नववा क्रमांक, आता सांगा यावरून Digital India मिशनसाठी सर्वात लायक शहर कोणते?

डिजिटल पिंपरी-चिंचवड साकारण्यासाठी काय आवश्यक आहे? त्यादिशेने काय प्रयत्न केले पाहिजे?

केंद्र सरकारने डिजिटल इंडियासाठी निर्धारित केलेले ११ स्तंभ अभ्यासून त्यावर आधारित काय गोष्टी आपल्या शहर पातळीवर शक्य आहेत यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. वरवर पाहता अनेक बाबींचा रोख महापालिकेवर जरी असला तरी केवळ सरकारी यंत्रणा एकटी पुरे पडणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरीक, माध्यमे यांची परस्परपूरक भूमिका असणे तितकेच महत्वाचे आहे. पालिकेने खालील सर्व बाबींचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा.

1] माहितीचा सुपरफास्ट मार्ग (Broadband Highway / I-Way)

पूर्वी नदी त्यानंतर हायवे (रस्ता) आणि आता I-Way (Information Highway) म्हणजेच फायबर ऑप्टीक्स (Fiber Optics) जिथे असेल तिथेच शहरे वसली जातील या शब्दात देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी वेगवान इंटरनेटचे शहरांसाठीचे असलेले महत्व अधोरेखित केले. वेगवान इंटरनेसाठी लागणारी संरचना (Infrastructure) सरकारने पुरवणे अपेक्षित असताना त्यामध्ये आपल्या महापालिकेला रस नाही याचे आश्चर्य वाटते. २०१४ मध्ये BSNL ने संपूर्ण शहर Fiber Optics ने जोडण्याचे नियोजन केले होते पण भरमसाठ खोदाई शुल्क आकारल्याने (इतर शहरांच्या तुलनेत सर्वात जास्त) त्यांना योजना गुंडाळावी लागली. परवानगी कोणाला द्यावी… BSNL सारख्या सरकारी का खाजगी कंपनीला? किती शुल्क आकारावे? हे ठरवण्याचा पालिकेला जरी अधिकार असला तरी लोकांना केंद्रभागी ठेऊन सर्वसमावेशक, लवचिक धोरण ठरवणे हेही पालिकेचे आद्यकर्तव्य आहे.

  • पूर्वीप्रमाणे संवाद समितीची (Communication Committee) नव्याने स्थापन करून त्याद्वारे पालिका अधिकारी, सरकारी, खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी, आयटी क्षेत्रातील जाणकार यांच्या टीममार्फत शहराच्या डिजिटल गरजा (Mobile, Fiber Optic, WiFi, DTH) योग्य रीतीने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • शहरातील सर्व मुख्य, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने नव्याने सेवा वाहिनी (Service Duct) बांधणे तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. Development Plan मध्ये आवश्यक बदल करून सेवा वाहिन्या बांधणे बंधनकारक केले पाहिजे. रस्ते खोदाईला यामुळे आळा बसेल तसेच सेवा वाहिन्यांचे नकाशे उपलब्ध करावे ज्यामुळे विविध कंपन्यांना (BSNL, Mahavitaran, MNGL) नागरिकांना आधुनिक सेवा देणे सोयीचे होईल.
  • सेवा वाहिन्या ह्या जर पालिकेच्या मालकीच्या असतील तर पालिका स्वतः Fiber Optic चे जाळे उभारू शकते. यातून पालिकेला दोन फायदे होतील, पालिकेच्या शहरातील सर्व अस्थापानांसाठी स्वस्तात इंटरनेट सेवा  मिळेल तसेच उर्वरित bandwidth भाड्याने देऊन उत्पन्न मिळवता येईल. १६ Mbps चा वेगवान वेग, रास्त किमतीत उपलब्ध झाल्याने नागरिकांबरोबर शहरातील व्यावसायिक, Startup कंपन्यांना त्याचा फायदा होईल.  
  • किमान ४ Mbps क्षमतेचे WiFi Hotspot शहरभर निर्माण करावेत. याबाबतीत इतर शहरांच्या तुलनेत आपण फार मागे आहोत.   

2] डिजिटल तंत्रज्ञानातून समाजाचे सक्षमीकरण (Digitally empowered society)

Digital तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून लोकांचे सक्षमीकरण होते त्यांची निर्णयक्षमता वाढते, फसवले न जाण्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. शहराची लोकसंख्या २० लाखावर पोहचली आहे आणि देशातील पहिल्या पाच जास्त वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या यादीत आपला समावेश होतो तेव्हा वाढत्या शहरीकरणाला Digitally empowered society उभारणे हि अपरिहार्यता आहे. गव्हर्नसमध्ये परिवर्तन घडवून ‘गुड-गव्हर्नस’मध्ये परावर्तीत करण्याचे सामर्थ्य डिजिटल तंत्रज्ञानात आहे. नागरिकांच्यासाठी महत्वाचे तीन ‘E’ म्हणजेच Enlighten-Engage-Empower बळकट करण्याची ताकत डिजिटल तंत्रज्ञानात आहे. नागरिकांसाठी महत्वाच्या खालील बाबींमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे.

a) सारथी हेल्पलाईन

  • Four Dimensional: नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरलेली सारथी हेल्पलाईन अधिक सक्षम करावी लागेल. सध्या सारथी चा वापर Two Dimensional आहे म्हणजेच १. माहिती मिळवणे २. तक्रार नोंदवणे तो Four Dimensional केला पाहिजे ३. सेवा मिळवणे ४. सहयोग (सूचना/प्रतिक्रिया). नुकतेच महाराष्ट्र सरकारने Four Dimension वर आधारित ‘आपले सरकार’ पोर्टल विकसित केले त्याला अनुसरून ‘सारथी’मध्ये आवश्यक बदल केले पाहिजे.
  • Mobile App: सध्याच्या सारथी App चे स्वरूप फारच static आहे ते dynamic म्हणजेच interactive केले पाहिजे अन्यथा नागरिकांमध्ये सारथीची लोकप्रियता कमी होईल. तक्रार नोंदवण्याची सोय सध्याच्या App मध्ये नाही. माहिती अद्ययावत करणे, शोध घेणे (search facility), कॉलिंग सारख्या बेसिक फिचर्स नसल्याने वापरकर्ते नाउमेद होण्याचा धोका उद्भवतो. App वापरणे हे सहज सोप्पे, उत्तेजित तसेच उत्कंठा वाढवणारे असेल तर युवा पिढी नक्कीच त्याकडे आकर्षित होईल.
  • सारथीची जबाबदारी निश्चित करणे व त्यासाठी स्वतंत्र वाहून (dedicated ) घेतलेली टीम तयार केली पाहिजे. प्रत्येक खात्यामध्ये नेमलेल्या आयटी समन्वयकाकडे त्या खात्यासबंधी माहिती अद्ययावत करण्याचे काम सोपवले पाहिजे. डॉ श्रीकर परदेशी यांच्या काळात दर शनिवारी पालिका विभागप्रमुख, आयटी टीम यांमध्ये ‘सारथी’ मिटिंग घेतली जाई आता त्यात खंड पडलाय. त्या मिटिंग पूर्वीप्रमाणे घ्याव्यात.

b) नागरी सुविधा केंद्र (CFC): Digital इंडिया साठी १.५ लाख पोस्ट ऑफिसेस तर राज्याच्या Digital महाराष्ट्र उपक्रमासाठी साठी SETU आणि महा ई-सेवा केंद्र मध्यवर्ती (Nodal) केंद्र म्हणून काम पाहणार आहे. त्याप्रमाणे आपल्या शहरात प्रत्येक वार्डात CFC केंद्र स्थापन करण्याचे नियोजन आहे. आत्तापर्यंत १६ CFC केंद्र सुरु करण्यात आले परंतु त्याचा म्हणावा तितका उपयोग होताना दिसत नाही. पोस्ट ऑफिस, SETU, महा ई-सेवा आणि CFC यामध्ये समन्वय राखल्यास नागरिकांना सोयीचे होईल. नागरी सुविधा केंद्रात मिळणाऱ्या सेवा नुकत्याच ऑनलाईन सुरु करण्यात आल्या हि चांगली गोष्ट आहे त्याची उपयुक्तता तपासली पाहिजे.

c) लोकांचा प्रशासनात सहभाग (Participatory Governance) – नागरिक सल्लामसलत, जनसहभाग या गोष्टी स्मार्ट सिटी प्रकल्पात राबवणे अनिवार्य आहे. आपले शहर स्मार्ट सिटीमध्ये नसले तरी काही बिघडत नाही आपल्याकडे सारथीचे खणखणीत नाणे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सारथीवर सूचना/प्रतिक्रिया घेऊन त्याला टोकन देऊन त्याद्वारे लोकांना प्रशासकीय कामकाजात सहभागी करता येईल. ग्राहकांच्या प्रतिक्रिया (feedback) जाणून घेण्यासाठी खाजगी कंपन्या अथक परिश्रम घेत असतात आपल्याकडे ‘सारथी’मधून त्याची आधीच तजवीज केली आहे फक्त त्याचा फायदा घेतला पाहिजे. संपूर्ण देशाला रोल मॉडेल ठरेल असा Participatory Budgeting सारखा उपक्रम आपल्याच पालिकेने राबवला हि अजून एक जमेची बाजू!

3] पिंपरी-चिंचवड महापालिका । माहिती तंत्रज्ञान विभाग

Digital पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो पालिकेचा माहिती-तंत्रज्ञान विभाग. पूर्वी ई-गव्हर्नन्स या नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या विभागाचे राज्याने ‘माहिती-तंत्रज्ञान’ असे नामकरण केले. केंद्र/राज्य यांनी राबवलेल्या योजनांसाठी (उदा. स्वच्छ भारत, digital इंडिया) शहर पातळीवर माहिती समन्वयक अशी नवी जबाबदारी या खात्याकडे आली आहे. पालिकेच्या एकूण ५५ विभागांमध्ये हा विभाग वेगळा आणि परिणामकारक आहे कारण सर्वच विभागांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात IT शिवाय पर्याय नाही. पालिकेचे इतर विभाग Vertical मानले तर माहिती-तंत्रज्ञान हा विभाग सर्वांना बांधून ठेवणारी Horizontal व्यवस्था आहे. या विभागाने खालील गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.

a) ई-गव्हर्नन्स (Website, Online services)

  • वर उल्लेख केल्याप्रमाणे २०१४ साली जरी पालिकेच्या ई-गव्हर्नन्स सेवांना पुरस्कार प्राप्त झाले असले तरी आजमितीस  केंद्र/राज्य सरकारच्या वेबसाईटशी तुलना केल्यास आपल्या ऑनलाईन सेवा कालबाह्य (outdated) वाटतात. National Informatics Center (NIC) या सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने प्रमाणित केलेली मानके पालिकेने वापरावी. NIC किंवा अन्य कार्यक्षम सरकारी संस्थेकडून पालिकेचे आयटी ऑडीट करून घ्यावे.
  • वेबसाईटचा दर्शनी भाग (Graphical User Interface) मध्ये सुसूत्रता नसणे, माहिती सतत अद्ययावत न होणे, RSS feed नसणे, Security certificate अद्ययावत नसणे, Payment Gateway मधील त्रुटी, Browser incompatibility, Dead links अश्या अनेक उणीवा सहज दिसून येतात. ऑनलाईन कर भरण्यासाठी पालिकेच्या साईटचा अनेक जण वापर करत आहेत त्यांची माहिती hacker पासून सुरक्षित आहे का हा प्रश्न जाणकारांना पडतो.

b) मोबाईल गव्हर्नन्स

  • Digital इंडिया मिशनमध्ये मोबाईलला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शहरात ९० टक्क्यांपेक्षा अधिक मोबाईल वापरण्याचे प्रमाण आहे तसेच मोबाईल मध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन सेवा देताना फक्त वेबसाईट डोळ्यासमोर न ठेवता मोबाईल वापर गृहीत धरून त्याप्रमाणे सेवा विकसित (Designing & Development) कराव्यात.
  • इंटरनेट नसतानासुद्धा पालिकेच्या सेवा SMS, IVRS कॉलद्वारे वापरता आल्या पाहिजे.

c) कुशल मनुष्यबळ: राज्याने माहिती-तंत्रज्ञान विभागाचे केवळ नाव बदलले नाही तर त्याची ध्येय-धोरणेही बदलली. त्याचाच एक भाग म्हणजे यापुढे या विभागात आयटी तंत्रज्ञांची भरती करणे अनिवार्य असणार आहे. ऑनलाईन सेवांचा दर्जा सुधारण्याबरोबर Inhouse development साठी पालिकेला याची मदत होईल व आयटीसाठी बाहेरील कंपन्यांना दिलेल्या कामावरचा खर्च कमी होऊ शकतो. Training/ Certificate course अनिवार्य करणे यातून सध्याच्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता सुधारण्याकडे (Capacity Building) लक्ष दिले पाहिजे. माहिती-तंत्रज्ञान सोडून इतर सर्व खात्यांमध्ये आयटी समन्वयकाची नेमणूक करावी यामुळे पालिकेच्या कामकाजात सुरळीतपणा येउन Real Time माहिती अद्ययावत करण्यासाठी मदत मिळेल. त्याद्वारे Gap Analysis, Process Improvement, Reengineering सारख्या प्रगत संकल्पना राबवणे शक्य होईल.

d) Outsourcing / Contract: सर्वच गोष्टी In House development वर चालू शकणार नाही आणि आजच्या जगात Outsourcing ला पर्याय नाही हे सुद्धा खरे असले तरी योग्य तिथेच आणि योग्य कंपनीची निवड करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे महाऑनलाईन निमशासकीय कंपनीमार्फत संकेतस्थळ विकसन, एसएमएस, पेमेंट गेटवे सारख्या सुविधा सरकारी आस्थापनांसाठी पुरवल्या जातात खर्च कमी करण्याच्या दृष्टीने त्याचा वापर करता येईल. जग इतके प्रगत झाले असताना Outsourcing कंत्राटामध्ये कंपनीचे कार्यालय पिंपरी-चिंचवड परिसरात असावे असे बंधन घालणे म्हणजे जगभरातील प्रगत कंपन्यांना आणि प्रगतीला थेट डावलण्यासारखे आहे. तसेच एखादी कंपनी नेमताना कंत्राटात सर्व आयटी बाबींचा विकसन व देखभालीचा समावेश करावा. मागील काळात अनेक छोट्या-मोठ्या वेबसाईट, मोबाईल App साठी स्वतंत्र कंत्राट दिले गेले यामुळे नाहक अतिरिक्त खर्च तर झालाच परंतु त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला, सुसूत्रता न राखता आल्याने एकसामायिकपणा लोप पावला.

e) Software Reusability & Open Source: पुनर्वापर (Reusability) हा software संकल्पेचा गाभा आहे यालाच अनुसरून महाराष्ट्र सरकारने ई-सेतू या Cloud repository ची निर्मिती केली. सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास मागे LBT अनिवार्य केले असताना त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक पालिकेने स्वतंत्र software विकसित केले यासाठी लाखाच्या घरात खर्च केला. जर ठाणे पालिकेने प्रथम software विकसित केले आणि त्या software चा source code ई-सेतू मध्ये समविष्ट केला असता तर इतर पालिका तेच software थोड्याफार प्रमाणात बदल करून वापरू शकल्या असत्या यातून मोठी आर्थिक बचत झाली असती. Open Source मुळेच Linux, Java सारखे प्रगत तंत्रज्ञान नागरिकांना उपलब्ध झाले. या तंत्रज्ञानात प्राथमिक Software code जगजाहीर केले जाते व त्यावर आधारित नवीन फिचर्स विकसित करण्याची मुभा संगणक तज्ञांना मिळते. पालिकेनेसुद्धा यापुढील काळात शक्य तितक्या Digital बाबींसाठी Open Source धोरणाचा स्विकार केला पाहिजे. यामुळे शहरातील संगणक तज्ञ आकर्षित होतील व त्यातून नवीन कल्पना, तंत्रज्ञान अत्यंत कमी खर्चात नागरिकांच्या उपयोगात आणणे शक्य होईल. कोणते software open source ठेवायचे किंवा कोणत्या फिचर्सला कार्यरत करायचे याचे सर्व हक्क पालिकेकडे असावेत ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

f) Enterprise Resource Planning (ERP): सध्या पालिकेत प्रत्येक खात्यासाठी, प्रत्येक कामासाठी वेगवेगळे software, website वापरले जातात. या सर्व Digital गोष्टी एकमेकांना जोडलेले नसल्याने माहितीची योग्य देवाणघेवाण होत नाही ज्यामुळे कार्यप्रक्रियेतील तोटे (operational losses) होतात, दोन खात्यात ताळमेळ नसल्याने तीच ती कामे करण्यात पैसा व वेळ नाहक खर्च होतो, याचा एकत्रित परिणाम निर्णयक्षमतेवर होतो अंतिमतः नागरिकांना उत्तम सेवा देण्यात पालिका कमी पडते. हे जर टाळायचे असेल तर एकात्मिक विकास (Consolidated Development) हे धोरण राबवले पाहिजे. ERP संकल्पनेवर आधारित software चा वापर सुरु करावा. यामुळे पालिकेची सर्व खाती जोडली जातील,  माहितीची जलद देवाणघेवाण होऊन निर्णय घेताना त्याची मदत मिळेल. कल्पना करा पालिकेच्या प्रत्येक खात्याचा कारभार कसा चालतो आहे, किती कर गोळा झाला, सर्व प्रकल्पांची स्थिती काय आहे हे ERP मुळे एका Dashboard वर महापौर, आयुक्तांना दिसेल. SAP, Oracle ह्या ERP कल्पनेवर आधारित जगन्मान्य software प्रणाली वापरण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. बंगळूरू, औरंगाबाद, नवी मुंबई सारख्या पालिका SAP प्रणाली वापरत आहे.

g) ऑनलाईन  संवाद: जनजागृती, विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फेसबुक, ट्विटर, गुगल, यूट्यूब सारखी कमी खर्चातल्या प्रभावी सोशल माध्यमांचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. ‘सोशल मिडिया समन्वयक’ हे स्वतंत्र पद निर्माण केले पाहिजे. पालिकेचे branding होण्यास मदत मिळेल तसेच लोकांच्या थेट प्रतिक्रिया/सूचना मिळतील. Email  Newsletter, सारथीद्वारे सूचना/प्रतिक्रिया, ऑनलाईन सर्वेक्षण अश्या अनेकविध गोष्टीतून नागरिकांशी उत्तम ऑनलाईन संवाद साधता येईल.

h) इ-कामकाज / पेपरलेस ऑफिस: सध्या पालिकेच्या १२ ऑनलाईन सेवा आहेत परंतु जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन pdf स्वरुपात मिळणे याला जर आपण ई-गव्हर्नन्स सेवा म्हणत असू तर ते चुकीचे आहे. जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज ते अंतिम प्रमाणपत्र मिळणे या सर्व क्रिया ऑनलाईन पार पडणे अपेक्षित आहे. सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सोय पाहिजे, टोकन नंबर व त्याद्वारे tracking ची सोय उपलब्ध असावी. कागदपत्रे अपलोडसाठी Digital लॉकरची सोय असली पाहिजे. नागरिकाची ओळख निश्चित करण्यासाठी आधार डाटाबेस वापरणे बंधनकारक असावे.

  • पालिकेचे सर्व अर्ज ऑफलाईन प्रमाणे ऑनलाईन भरण्याची सुविधा असली पाहिजे. Forms should be made simple and user friendly and only minimum and necessary information should be collected.
  • Online applications and tracking: Online applications and tracking of their status should be provided.
  • Online repositories: Use of online repositories e.g. for certificates, educational degrees, identity documents, etc. should be mandated so that citizens are not required to submit these documents in physical form.
  • Integration of services and platforms: Integration of services and platforms e.g. Aadhaar platform of Unique Identity Authority of India (UIDAI), payment gateway, Mobile Seva platform, sharing of data through open Application Programming Interfaces (API) and middleware such as National and State Service Delivery Gateways (NSDG/SSDG) should be mandated to facilitate integrated and interoperable service delivery to citizens and businesses.
  • नागरिकांचा डेटाबेस: विविध अर्ज, बिल, सर्वेक्षण, सारथी मधून प्राप्त झालेली नागरिकांची माहितीचे एकत्रीकरण करून सुरक्षित डेटाबेस तयार करावा ज्यामुळे भविष्यात Citizen Dashboard सारख्या सुविधा पालिकेला देता येईल. Citizen Dashboard  मध्ये  बिले, तक्रार, सूचना , परवानग्या, अर्जाची  स्थिती या सर्वांचा लेखाजोगा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
  • Workflow: पालिकेची विविध खाती एकमेकांना ERP मुळे जोडता येतील हे आपण माहित केले परंतु त्याच्या  पुढे जाऊन Workflow संकल्पना वापरून अर्जाचा सुरवात ते मान्यता/नकार पर्यंतचा प्रवास Digital पद्धतीने नोंदवता येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी, नागरिक यांना Real Time सद्यस्थिती जाणून घेता येईल. सर्वात महत्वाचे  अधिकाऱ्यांच्या कारभारात पारदर्शकता आल्याने दिरंगाई हद्दपार होईल.
  • Data analysis: पालिकेला विविध मार्गांनी माहिती प्राप्त होत असते त्याचे करायचे काय असा प्रश्न आपल्यातला अनेकांना पडतो जर वेळीच आवश्यक पाऊले उचलली नाहीत तर जसे पूर्वी फायलींमुळे कपाटे गच्च भरून जायची त्याप्रमाणे कॉम्पुटरची मेमरी नाहक वाया जाईल. Data Analysis मध्ये माहितीची डिजीटल नोंद – चुका दूर करणे – वर्गीकरण – पृथःकरण – प्रमाणित स्वरुपात जतन (Archiving) असे ढोबळमानाने टप्पे पडतात. पालिकेला निर्णय प्रक्रियेत याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तज्ञ सल्लागार नेमून पालिकेने या हा प्रकल्प त्वरित हाती घ्यावा.
  • Disaster Recovery: भूकंप, आग, पूर अश्या आपत्तीजनक परिस्थितीत माहितीची सुरक्षा/जतन करणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. खाजगी कंपन्यात असते त्याप्रमाणे Data Backup policy, शहरापासून दूर अन्य भागात माहिती जतन करणे याचा अंगीकार केला पाहिजे. एका झटक्यात माहिती नष्ट झाली तर काय गोंधळ माजू शकतो हे वेगळे सांगायची गरज नाही.
  • Work From Home / Work From Mobile: खाजगी कंपन्याप्रमाणे अश्या अभिनव कल्पना राबवणे शक्य आहे. पालिकेचे काम जितके सोप्पे, विकेंद्रित, घरबसल्या करता येणे शक्य होईल तितका त्याचा फायदा नागरिकांना मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणीबाणीच्या परिस्थितीत महत्वाचे निर्णय मोबाईलद्वारे घेण्याची व्यवस्था असली पाहिजे. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात लवचिकता, सहजता आणता येईल एकूणच त्यांना उत्तेजना मिळेल.

4] शहरातील अन्य घटकांचे योगदान

महापालिकेव्यतिरिक्त अन्य घटकांचे Digital पिंपरी चिंचवड साठी काय योगदान असले पाहिजे ते इथे पाहूयात. Digital शहर साकार करण्यासाठी शहरातील अन्य घटकांचे म्हणजेच लोकप्रतिनिधी, नागरिक, कामगार, खाजगी कंपन्या, पत्रकार यांचेही योगदान तितकेच महत्वाचे आहे.

a) लोकप्रतिनिधी – शहराच्या लोकप्रतिनिधींनी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेऊन Tech Savvy Leader म्हणून नवी ओळख प्रस्थापित करावी.

  • सोशल कनेक्ट: निवडणुकीवर सोशल प्रचाराचा किती प्रभाव असतो हे वेगळे सांगायला नको. सोशल माध्यमांमुळे  नागरिकांनासुद्धा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधणे सोप्पे जाते. सध्या पालिकेच्या वेबसाईटवर नगरसेवकांचा अधिकृत ईमेल, मोबाईल क्रमांक दिला जातो त्यामध्ये नव्याने त्यांची ऑनलाईन ओळख सुद्धा द्यावी. प्रत्येकाचे अधिकृत फेसबुक, ट्विटर, WhatsApp तसेच खाजगी ईमेल आयडी द्यावे. लोकप्रतिनिधींच्या नावाने फेक खाते उघडून चुकीची माहिती प्रसारित करण्याचे प्रमाण वाढते आहे, अधिकृत खाते प्रसिद्ध केल्याने अश्या गोष्टींना आळा बसेल. निवडणूक खात्यानेही उमेदवारांकडून अर्ज भरताना हि माहिती घ्यावी.
  • Digital कामकाज: तंत्रज्ञानाकाडे आव्हाहन म्हणून न बघता समाजसेवेची प्रभावी संधी म्हणून पहिले पाहिजे. पालिकेने दिलेल्या अधिकृत ईमेलचा वापर अभावानेच होताना दिसतो, पालिकेचे निर्णय, GB मिटिंग वृत्तांत ईमेलवर कितीजण वाचतात? पालिकेच्या ई-गव्हर्नन्स सेवांचा वापर नगरसेवकांनी स्वतः केल्यास त्यातील उपयुक्तता, त्रुटी त्यांच्या लक्षात येईल व त्याचा योग्य पाठपुरावा त्यांना करता येईल. सर्व पक्षांचे, प्रत्येक लोकप्रतिनिधीचे स्वतंत्र कार्यालय, स्वीय सहायक, आयटी/सोशल मिडिया टीम आहे या सर्वांचा राजकारणात सकारात्मक वापर केल्यास लोकांचे प्रश्न प्रभावीपणे सुटतील.
  • Digital hoarding: अनधिकृत होर्डिंग, banner यामुळे शहरचे विद्रुपीकरण होते हे सिद्ध झाल्याने हाय कोर्टाचे त्याविरोधात कडक निर्देश घातले आहेत. या पुढील काळात Digital hoarding साठी आग्रह धरावा.

b) नागरिक/कामगार – कामानिमित्त अनेक नागरिक या शहरात येतात जरी रहिवासी नसले तरी शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही सहभाग महत्वाचा आहे. यापुढे खाजगी कंपन्यांप्रमाणे सरकारी कंपन्यांनाही शनिवार, रविवार सुट्टी घोषित होईल तेव्हा सरकारी कामांसाठी वेळ काढणे अवघड होईल. LPG, महावितरण, BSNL या सेवा पुरवठा कंपन्यांचे सर्व कारभार ऑनलाईन/मोबाईलवर शक्य आहे गरज आहे लोकांनी त्याचा वापर करण्याची. वेळेची बचत होईल, पार्किंग, वाहतूक समस्या काहीअंशी दूर होण्यास मदत मिळेल. WhatsApp/सोशल मिडियाद्वारे संबंधित सरकारी यंत्रणेवर सकारात्मक दबाव ठेवणे, ऑनलाईन RTI, सारथीचा वापर करणे, ITSM सुविधेने सज्ज BRT सारख्या सार्वजनिक सेवेचा वापर करणे तसेच तंत्रज्ञानाच्या वापरातून कामाच्या/राहत असलेल्या परिसरातील समस्यांची उकल करणे यातून हे शहर सर्वांसाठी सुसह्य होईल “Come join us to make Pimpri Chinchwad best place to live and work…”

c) आयटी आणि आयटी पूरक सेवा (IT & ITES): हिंजवडी, तळवडे आयटी पार्कचे सानिध्य लाभल्याने हे शहर केवळ उद्योगनगरी न राहता आयटी शहर म्हणूनही ओळखले जाते. उच्च शिक्षित तंत्रज्ञ शहरात वास्तव्यास आहे.त्यांना शहराच्या डिजिटल मिशन मध्ये कसे सामावून घेता येईल हे पाहूयात.

  • आयटी चाप्टर – Computer Society of India (CSI) संचलित संगणक तज्ञांचे देशभरात एकूण ७२ चाप्टर (शाखा) कार्यरत आहे ज्याची संख्या एक लाख पेक्षा अधिक आहे. माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, संधी  ,ई-गव्हर्नन्स हि CSI ची प्रमुख उद्दिष्ट्ये. जर आपल्या शहरात वास्तव्यास असलेल्या विविध कंपन्यांच्या वरिष्ठ अभियंत्यांचा मिळून ‘पिंपरी-चिंचवड चाप्टर’ केल्यास शहराच्या डिजिटल मोहिमेला मोठे बळ मिळेल. यांतर्गत सर्व प्रोसेसेस  CSI ने प्रमाणित केल्या आहेत पालिकेला फक्त पुढाकार घेऊन मिटिंगसाठी जागा उपलब्ध करणे जागृती करणे इतकेच करायचे आहे. शहरातील अनेक तंत्रज्ञ त्यांच्या ज्ञानाचा वापर शहर सुधारणेसाठी करण्यास उत्सुक आहेत पालिकेने त्यांना सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.
  • CSR / Smart City vertical – Digital पिंपरी-चिंचवडसाठी सिएसआर (Corporate Social Responsibility)  माध्यम अत्यंत उपयोगी ठरू शकते.. यामुळे आर्थिक मदत तर मिळेलच परंतु आयटी कंपन्या तांत्रिक बाबीत सहकार्य देऊ शकतील. स्मार्ट सिटी प्रकल्प घोषित झाल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वतंत्र ‘स्मार्ट सिटी’ खाते (Vertical) स्थापन केले आहे. स्काडा यंत्रणा, Digital Surveillance, Traffic management सारख्या मोठ्या प्रकल्पात याद्वारे मदत मिळवता येईल.
  • Industrial Training Institute (ITI) – डिजिटल पिंपरी-चिंचवड तसेच Skill Development अंतर्गत आयटीआय संस्थांमध्ये ई-गव्हर्नन्स, एम-गव्हर्नन्स सर्टीफिकेट कोर्स सुरु करावा ज्यामुळे पालिकेला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल त्यामुळे पालिकेच्या कामांचा दर्जा सुधारण्यास मदत मिळेल.
  • कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी: सीएसआर माध्यमातून शहराच्या गव्हर्नन्समध्ये आर्थिक व तांत्रिक सहकार्य देऊ केले पाहिजे. Communication कमिटी, आयटी चाप्टर या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामार्फत Ease of doing business तसेच ई-गव्हर्नन्समध्ये सुधारणा याकडे लक्ष दिले पाहिजे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक कंपन्यांमध्ये सरकारी वेबसाईट ब्लॉक केलेल्या असतात लोकांच्या सोयीसाठी अश्या वेबसाईट (बिल, अर्ज, तक्रार) वापरायला परवानगी दिली पाहिजे. पालिकेच्या अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहचत नाही याकामी कंपन्यांचे एचआर उत्तम संपर्काचे माध्यम (point of contact) बनू शकतील. उदा. participatory budgeting उपक्रमाची वेबलिंक कंपनीच्या एचआर खात्यातर्फे सर्व कामगारांना पाठवल्यास त्याला चांगली प्रसिद्धी मिळेल व सहभाग वाढेल

d) व्यावसायिक: विविध सरकारी परवानग्या, टेंडर, कर भरणे, समस्या ऑनलाईन उपलब्ध झाल्याने जबाबदारी निश्चित होईल(Accountability) व पारदर्शक व्यवहार (Transparency) वाढीस लागेल ज्यामुळे भ्रष्टाचार कमी स्थानिक व्यवसाय वाढीस लागेल. Fiber Optics, WiFi, ४G मुळे शहरात आयटी Startup कंपन्यांना पोषक वातावरण तयार होईल. आर्थिक व्यवहार, बिलिंगसाठी Handheld devices, Point of Sale (PoS), Near Field Communication (NFC) सारख्या आधुनिक तंत्रज्ञान वापरातून थेट होणाऱ्या पैश्यांच्या व्यवहाराला आळा बसेल.

e) शाळा/कॉलेजेस: Digital युगामुळे शिक्षणाची दिशा बदलून गेली आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. द्रुकश्राव्य माध्यमातून मुलांच्या आकलन शक्तीत वाढ होईल. शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञान, सोशल मिडियाचे फायदे/तोटे याबद्दलही मुलांना समुपदेशन करणे गरजेचे आहे, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि मानसिकता त्या वयात रुजेल. कॉलेजेस मध्ये वायफाय सुविधा पुरवणे मुलांच्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी अनिवार्य बनले आहे.

f) पत्रकार/मिडिया: हा लेख सर्वात प्रथम सकाळमधून प्रकाशित झाला तेव्हा Digital पिंपरी-चिंचवडचे महत्व काय त्याचा नागरिकांनी आग्रह का धरला पाहिजे याबाबत जागृती करण्याची महत्वाची जबाबदारी माध्यमांची आहे. सोशल मीडिया App मुळे Real time updates देणे शक्य झाले आहे. नागरिकांना प्रतिक्रिया/सूचना देणे सोप्पे झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा यानंतर मोबाईल आणि इंटरनेट या शहरवासीयांच्या प्राथमिक गरजा बनल्या आहेत तेव्हा पत्रकारांनी या नव्या विषयावर अभ्यास/संशोधन करावे.

g) इतर शासकीय / निम शासकीय कार्यालये: जसे आधीच स्पष्ट केले त्याप्रमाणे Digital Pimpri Chinchwad हि केवळ महापालिकेची एकट्याची जबाबदारी नाही. शहरात सेवा पुरवणाऱ्या शासकीय / निम शासकीय कार्यालयांनीसुद्धा त्यांच्या कामकाजात बदल केला पाहिजे. Mahavitaran, BSNL, IRCTC, LPG संस्थांच्या बहुतांश सेवा ऑनलाईन सुरु झाल्या पण इतक्यावरच न थांबता अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान वापरून त्याद्वारे नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. काही सूचना

  • Mahavitaran ने पालिकेच्या पाणीपुरवठा खात्याप्रमाणे अत्याधुनिक स्काडा यंत्रणा वापरल्यास वीज जाण्याचे प्रमाण कमी होईल तसेच बिघाड शोधणे (Fault detection) त्वरित करता येईल.
  • BSNL ने त्यांचे सर्व Exchange आधुनिक तंत्रज्ञानावर अपग्रेड करण्याचे काम हाती घेतले ते लवकर पूर्ण करावे तसेच जुन्या Copper वायरी Fiber Optics ने बदलणे, WiFi hotspot सुविधा यावर त्वरित कामे सुरु करावी.  
  • CCTV Surveillance – CCTV बसवून झाले परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. नियंत्रण कक्ष पुण्याला असल्याने शहरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना अडचणी येतात. सुरक्षेमध्ये माहितीच्या जलद देवाणघेवाणीला अनन्यसाधारण महत्व असताना पिंपरी-चिंचवड मध्ये नियंत्रण कक्ष का स्थापन केला जात नाही? नियम तोडल्यावर RTO क्रमांकावरून वाहनचालकांचा शोध घेताना अडचणी येत असतील तर आपण CCTV यंत्रणेचा पूर्ण क्षमतेने वापर करतो असे म्हणूच शकत नाही. वाहनांची माहिती अद्ययावत करणे, Software द्वारे संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित करणे हे शक्य आहे.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: नव्याने सुरु झालेल्या बीआरटी सेवेमध्ये ITSM यंत्रणा मैलाचा दगड ठरत आहे.  यामुळे बस कधी येणार, येणारे बस स्थानक कोणते हे कळू लागल्याने प्रवाश्यांची मोठी सोय झाली. तंत्रज्ञानाचा वापर केवळ बीआरटीपुरता मर्यादित न ठेवता शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे सर्व पर्याय (उपनगरी रेल्वे, रिक्षा, PMPML, प्रस्तावित मेट्रो) विचारात घेऊन एकात्मिक यंत्रणा विकसित केली पाहिजे. तिकिटासाठी डेबिट कार्डचा वापर, रेल्वे-बस तिकीट एकत्रित करणे, गुगलच्या मदतीने मोबाईलद्वारे real time बस, रेल्वेचे वेळापत्रक तसेच वाहतुकीची सद्यस्थिती पाहता येणे या सेवा लोकांसाठी अत्यंत फायद्याच्या ठरतील. प्रमुख स्थानकात Information Kiosk बसवणे, सारथी हेल्पलाईन तसेच स्वतंत्र मोबाईल App द्वारे शहरात पर्यटन/कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची सोय होईल.
  • पोलिस यंत्रणा – नागरिकांना न घाबरता अनुचित प्रकार पोलिसांना कळवण्यासाठी नुकतेच WhatsApp  नंबर सुरु करण्यात आले तसेच वाहतूक पोलिसांचे स्वतःचे फेसबुक पेज आहे त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया/सूचनांना प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. सोशल मिडियाबाबत पोलिसांचा बदलता प्रतिसाद स्वागतार्ह आहे. सामाजिक अस्थिरतेला उदयुक्त करणाऱ्या मेसेजेचा प्रसार रोखणे, विशेषतः महिला व जेष्ठांना तत्काळ सुरक्षा प्राप्त होईल यासाठी यंत्रणा विकसित करावी. वाढत्या Digital युगामुळे सायबर क्राईम वाढण्याचा धोका आहे तेव्हा वेळीच सावध होऊन सायबर क्राईम खात्याचे सक्षमीकरण केले पाहिजे.
  • Disaster Management: सुरक्षित शहर हेच खरे स्मार्ट शहर. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना योग्य माहिती, सूचना पुरवण्याची जबाबदारी पालिका प्रशासन, पोलिसांची आहे. संपर्काचे विविध पर्याय याकामी उपयोगी पडू शकतात. पोलिस आयुक्त, महापौर, पालिका आयुक्त यांना नागरिकांशी तातडीने संवाद साधणे शक्य झाले पाहिजे.

 

असे झाले तर किती चांगले होईल…

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा निनाद (काल्पनिक पात्र) नेहमीप्रमाणे सकाळी उठला, ऑफिससाठी तयार होताना मोबाईलने त्याला दिवसाच्या कामांची लिस्ट अपडेट केली, रहिवासी कर भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे हे कळल्यावर त्याने पालिकेचे App उघडले व नेटबँकिंगचा वापर करून तत्काळ पैसे भरले. PMPML चे App उघडून निगडी-हडपसर बस त्याच्या जवळच्या बसस्थानकात कधी येणार याचा अंदाज घेऊन तो तयारीला लागला. MH१४ News वरून शहरातील स्थानिक बातम्यांचा आढावा घेऊन त्याने घर सोडले. तिकिटासाठी डेबिट कार्ड swap केले. बसमधून प्रवास करताना कासारवाडीजवळ जलवाहिनी फुटून पाणी वाया जाताना दिसल्यावर त्याने लागलीच फोटो काढून सारथी App वर अपलोड केला व पालिकेकडून तक्रारीचा टोकन sms मिळाल्याची खात्री केली. digital तंत्राच्या वापरातून वाहतूक यंत्रणा Centralized झाल्याने प्रवासाला आता पूर्वीपेक्षा कमी वेळ लागतो… त्याने मनातल्या मनात पोलिसांचे आभार मानले. गाणी ऐकताना सहजच त्याने मोबाईलवर Citizen Dashboard पाहिला, त्यावर पूर्वी केलेल्या अर्जाला आधार कार्डाची प्रत जोडणे आवश्यक होते हे त्याला समजले त्याने लागलीच Digital Locker सुविधेचा वापर करत प्रत अर्जाला जोडली. कंपनीचे मेल तपासून कामाचा अग्रक्रम ठरवला व कंपनीत दाखल झाला. कंपनी सुटल्यावर तो बसने परतला परंतु त्याला मेडिकल शॉपमधून औषधे घ्यायची होती व तिथे जाण्यासाठी बसची सोय नसल्याने App चा वापर करत रिक्षा बोलावली. रिक्षाभाडे Online Wallet द्वारे भरले. औषध विक्रेत्याने पावती ईमेलवर पाठवली व पैसे डेबिट कार्डवर स्वीकारले. दिवसभरातील सर्व कामे चुटकीसरशी व काहीही त्रास न होता झाल्याने तो खुश होता त्याचा वेळ वाचला होता त्याने आता Digital जगाला बाजूला सारत उर्वरित वेळ मुलांशी खेळण्यात, घरच्यांशी संवाद साधण्याला व्यतीत केला. Digital world is just a supportive factor to make your Real world easy, happy and joyful.

…Digital शहराची कास धरल्यास वरचा प्रसंग प्रत्यक्षात उतरेल यात शंका नाही !

————————————————————-

सदर लेख इथेही वाचू शकता
१. गुगल ड्राइव्ह लिंक: https://goo.gl/WpZRSy
२. ]अनमोल[ ब्लॉग: https://amolmd.wordpress.com/2015/12/05/Digital-Pimpri-Chinchwad
३. सकाळ पेपर्सने दिनांक २९ नोव्हेंबर २०१५ रोजी, त्यांच्या पिंपरी-चिंचवड अंकाच्या वर्धापनदिनानिमित्त खास पुरवणीत लेखाचा संक्षिप्त भाग प्रकाशित केला होता: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=XNHGH

नोंद: वरील लेखात नमूद केलेले सर्व मुद्दे हे वैयक्तिक असून ते ‘पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम’ या संस्थेमार्फत प्रमाणित करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापलिकेतील सारथी, वेबसाईट आणि अन्य आयटी उपक्रमात लेखक स्वतः सहभागी आहेत तसेच PCCF टीममार्फत ‘आयटी आणि गव्हर्नस’ या विषयावर सूचना देणे, पोर्टल विकसित करणे (design & development) या बाबीत विनामोबदला सल्लामसलत (IT Consultation) करत आहेत. गेल्या ३ वर्षांच्या अनुभवातून, अभ्यासातून आणि शहराविषयी वाटणाऱ्या आत्मीयातेतून लेखाची प्रेरणा मिळाली. तरी कोणत्याही मुद्द्याबद्दल आक्षेप असल्यास किंवा सूचना/प्रतिक्रिया द्यायची असल्यास कृपया ईमेल आयडीवर संपर्क साधावा md.amol@gmail.com

दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…

गाणे गायला आवडत जरी असले तरी त्यातले संपूर्ण ज्ञान नसले कि होते फजिती! मागे बायकोच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात खास अंगाई गीत गाण्यासाठी आईने तिच्या मैत्रिणीला बोलावले होते. उत्साही मला सुद्धा ‘नीज माझ्या नंदलाला’ गायचा मोह आवरता आला नाही… त्याच उत्साहात पुढे ‘तरुण आहे रात्र अजूनि’ हे गायला सुरवात करणार तेवढ्यात आईच्या मैत्रिणीने हटकले, अरेsss हे कुठले गाणे गातोय! …ओहो खरेतर शब्दातून समजते गाणे कोणत्या धाटणीचे आहे पण चाल अशी काही आहे की ते अंगाई गीतच वाटायचे. समजूनही न उमजणे यालाच म्हणत असावे… 🙂

तेव्हा ठरवले कि त्याच चालीत अंगाई गीताला साजेसे बोल बसवायचे. दोन कडवी जमल्या असे वाटते. पहिल्या दोन ओरिजिनल व नंतरच्या बनवलेल्या. आणि हो… याचा एक फायदा आहे – ‘एका दगडात दोन पक्षी’. कसे काय?? एकाला जागायला तर दुसऱ्याला झोपायला. आता कोणासाठी ते तुम्ही ठरवा 😉


तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे


दाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे
दूर त्या तिमिरात चंद्र, बघ कसा निजतो आहे रे…

परतुनी पक्षी नभातुनी, घरट्याची ओढ त्यांना
मंद वारा त्या किनारी, बघ कसा विसावला रे…


शंकर महादेवन यांच्या आवाजातील गाणे खालील दुव्यावर ऐका

‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून

Sarathi
Sarathi Helpline

माझा फोन खणाणला. पलीकडून मित्र फोनवर उत्साहाच्या भरात “अरे अमोल झकास! मी माझ्या घरासमोरील रोडची तक्रार ‘सारथी’वर दिली आणि केवळ ३ दिवसात पिंपरी-चिंचवड पालिकेने तक्रारीवर समाधानकारक कारवाई केली!”. अनेकांना परिचित असलेले ‘सारथी’ नाव लवकरच पिंपरी चिंचवडच्या घराघरात पोहोचणार आहे. काय आहे ‘सारथी’? जाणून घ्यायचय… चला तर मग पालिका-नागरिक सहभागातून जन्माला आलेला ह्या अनोख्या प्रकल्पाची जडणघडण कशी झाली याचा आढावा माझ्या नजरेतून घेऊयात…

‘सारथी’मुळे आयुक्तांच्या कोअर टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य. सुरवातीस नागरिक म्हणून आम्ही ह्या कोअर टीम मध्ये कसे सहभागी झालो ते पाहू. पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून कारभार स्वीकारल्यावर थोड्याच दिवसात डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यांच्या चांगल्या कामातून नागरिकांप्रती मैत्रीपूर्ण व्यवहार (pro citizen) अशी प्रतिमा तयार केली. यामुळे प्रोत्साहन मिळून अनेक दिवसांपासून माझ्या मनातील पालिकेसाठीच्या कल्पना मांडण्याचे ठरवले त्यानुसार फेब्रुवारी २०१३ मध्ये आयुक्तांची भेट घेऊन काही सूचना मांडल्या. माझ्या सूचनांची आयुक्तांकडून लागलीच दखल घेण्यात आली. ‘नगरसेवकांसाठी ईमेल’ ही त्यातलीच एक सूचना लगेचच अंमलात आणली गेली. ह्या पहिल्या भेटीला माझ्या ब्लॉगवर मी ‘ग्रेट भेट’ असे संबोधले होते जे पुढच्या काही महिन्यात ‘सारथी’मुळे तंतोतंत समर्थनीय ठरले. माझ्याप्रमाणे इतरांनीही आयुक्तांना तांत्रिक/ई-गव्हर्नन्स मध्ये सूचना केल्या होत्या. त्यातल्या आम्हा तिघांना मी, अमित, राज यांना हेल्पलाईन प्रकल्पात सहभागी होण्याविषयी आयुक्त कार्यालयाकडून निमंत्रण आले. प्रकल्पाचे स्वरूप लक्षात आल्यावर माझ्या समविचारी आणि यामध्ये आवड असलेल्या मित्रांना परवानगीने सहभागी करून घेतले (रोहित, रोहन, बिल्वा हे माझे सहकारी ज्यांच्यासोबत नंतर काही दिवसातच ‘निगडी प्राधिकरण सिटीझन्स फोरम‘ हा ग्रुप स्थापन करण्यात आला ज्याचे उद्घाटन १ मे रोजी आयुक्तांच्या हस्ते पार पडले) एकत्रितपणे आमच्या ग्रुपला आयटी टीम असे संबोधले जाऊ लागले. आयुक्त, सहायक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, खातेप्रमुख (HOD), आणि आमची आयटी टीम मिळून कोअर टीम तयार झाली.

एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये असते त्याचप्रमाणे प्रकल्पाची आखणी केली गेली. दर शनिवारी सकाळी ९ ते ११ वेळात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोअर टीमची बैठक चालत असे. हेल्पलाईन म्हणजे नक्की काय? त्याचा सर्व स्तरातील नागरिकांना कसा उपयोग झाला पाहिजे याबद्दलच्या संकल्पना आयुक्तांनी आम्हाला समजावून सांगितल्या. हेल्पलाईनची माहिती ‘नेहमी विचारले जाणारे प्रश्न’ म्हणजेच FAQ स्वरुपात देण्याचे ठरले. पालिकेच्या ५४ खात्यांमधून महत्वाच्या आणि ज्यांचा नागरिकाशी सतत संपर्क येतो अश्या २८ खात्यांची यासाठी निवड करण्यात आली. निवड केल्यावर टीममधील प्रत्येकाला प्रश्न तयार करणे ही प्राथमिक कृती सोपवण्यात आली. खातेप्रमुखांना त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून प्रश्नांबरोबर त्याची उत्तरे तयार करण्यास सांगितले. सर्वांच्या प्रश्नांचे संकलन करून येणाऱ्या पुढच्या शनिवारी प्रोजेक्टरवर प्रस्तुती करण्याची जबाबदारी सुधीर बोराडे (प्रकल्प समन्वयक) यांच्याकडे देण्यात आली. प्रोजेक्टर दिसणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे अपेक्षित उत्तर काय यावर चर्चा होत असे, उत्तर हे सोप्प्या भाषेत असावे त्यातून चुकीचा अर्थ निघू नये यासाठी प्रत्येक शब्दनशब्द आयुक्तांकडून कटाक्षाने तपासला जायचा. या बैठकीमुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या – प्रश्नोत्तरे प्रमाणित झाली (याआधीच्या काळात नागरिकांना एकाच कामासाठी ‘अ’ प्रभागात जी माहिती सांगितली जायची त्यापेक्षा वेगळी माहिती ‘ड’ प्रभागात सांगितली जात होती), प्रत्येक खात्याचे पृथकीकरण (Business Process Re-engineering – BPR) झाले यामुळे प्रत्येक खातेप्रमुखाला दुसऱ्याच्या खात्याची कार्यपद्धती तपशिलात माहित झाली. ज्या गोष्टीत त्रुटी आढळल्या त्यावर आम्ही वेळोवेळी सूचना केल्या जसे क्रीडा खात्याची साप्ताहिक सुट्टी रविवारऐवजी कामकाजाच्या दिवशी असावी जेणेकरून मुलांना सुट्टीचा उपयोग होईल, पालिकेचे सर्व फॉर्म वेबसाईटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध करावे या काही निवडक सूचना ज्यांची आयुक्तांकडून लागलीच दखल घेतली गेली. बैठकीच्या शेवटी आयुक्त आढावा घेऊन प्रत्येकाला काम नेमून देत असत. बैठकीच्या सर्व तपशीलाच्या नोंदी दूरसंचार अधिकाऱ्यांमार्फत केल्या जात होत्या. ह्या नोंदी (Minutes of Meeting) टीमला ईमेल मार्फत पाठवल्या जायच्या.

प्रकल्पाचे टप्पे आखून त्यासाठीचा कालावधी ठरवण्यात आला होता त्याचे वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे पाळले जायचे. निवडण्यात आलेल्या २८ खात्यांपैकी बहुतांश खात्यांचे प्रश्नोत्तरे अंतिम झाल्यावर सर्वांचा आत्मविश्वास दुणावला. सुरवातीस फक्त माहिती देणे हा उद्देश असलेल्या प्रकल्पाच्या मधल्या टप्प्यावर एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो म्हणजे हेल्पलाईनवर नागरिकाला तक्रार नोंदवता येणे. सांगायला आनंद होतोय कि आमच्या सततच्या पाठपुराव्याने सध्या मैलाचा दगड ठरू पाहणारा हा निर्णय प्रत्यक्षात आला. हेल्पलाईनला ‘सारथी’ नाव सुचवले खुद्द आयुक्तांनीच. ‘सारथी’ म्हणजे मार्गदर्शक अर्थात मदतनीस आणि इंग्रजीमध्ये SARATHI (System of Assisting Residents And Tourists Helpline Information) शब्दातील प्रत्येक अक्षर जोडून होणारा संपूर्ण अर्थबोध अश्या समर्पक नावाला सर्वांनी एकमुखाने संमती दिली. हाच तो क्षण ज्यावेळेस हेल्पलाईनला एक उचित नाव ठरवण्यात आले ते म्हणजे ‘सारथी’. यानंतर ऑपरेटरची निवड त्यांचे प्रशिक्षण, कॉलसेंटरचा नंबर कसा पाहिजे, वेबसाईट आणि पुस्तकरूपात माहिती उपलब्ध करणे, ‘सारथी’ची जाहिरात या प्रत्येक गोष्टी अत्यंत अभ्यासपूर्वक, बारकाईने आणि सर्वांचे विचार लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या. कच्चा मसुदा तयार झाल्यानंतर आयुक्तांनी माननीय महापौर, पदाधिकारी यांच्यासमोर ‘सारथी’ प्रकल्पाचे सादरीकरण केले त्यावर त्यांच्याकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन मगच ‘सारथी’चा अंतिम मसुदा तयार झाला …आणि तो दिवस उजाडला १५ ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘सारथी’ चे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

‘सारथी’ला आता २ महिने पूर्ण होत आहेत. १०००० कॉलचा आकडा गाठणे, समस्यांच्या निवारणाची टक्केवारी ७० च्या पुढे असणे, Android वर सर्वात जास्त डाउनलोड या वर्गात समावेश होणे तसेच केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधानांचे सल्लागार सम पित्रोदा यांनी ‘सारथी’सारख्या सेवेचे अनुकरण अन्य मोठ्या शहरांनी करावे हा दिलेला सल्ला पाहून आम्ही सर्वांनी घेतलेल्या प्रयत्नांचे चीज झाले असे वाटते. एखाद्या सरकारी प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या गाजावाजात होते पण नंतर त्याकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होते असे सहसा दिसणारे चित्र ‘सारथी’बाबत दिसून येत नाही. उद्घाटन झाल्यानंतरही ‘सारथी’च्या बैठका (Follow up meeting) अजूनही सुरूच आहेत. यामध्ये माहितीच्या उपयुक्ततेचे मुल्यांकन करणे, नागरिकांना हव्या असलेल्या नवीन माहितीचे आणि भेडसावणारया समस्यांचे विश्लेषण करणे (Trend Analysis) तसेच प्रश्नोत्तरे अधिकाधिक अचूक, परिपूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. औद्योगिक नगर यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड हे आयटी शहर म्हणूनही ओळखले जातेय तेव्हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारया नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून वेबसाईटवर माहिती उपलब्ध करण्यात आली. खास युवावर्गासाठी ११ ऑक्टोबर रोजी ‘सारथी’चे Mobile App, Ebook प्रकाशित करण्यात आले, पालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर वेळोवेळी याविषयी माहिती देण्यात येत आहे या सर्वांमुळे ‘सारथी’चा महाजालावर चांगल्याप्रकारे प्रसार होत आहे. अजून काही दिवसात ‘सारथी’चा स्तर आणखीन उंचावेल कारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ‘सारथी’ची नवीन आवृत्ती प्रकाशित होणार आहे यामध्ये महापालिकाव्यतिरिक्त अन्य ११ शासकिय कार्यालयांशी संबंधित माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय (जाती, उत्पन्न दाखले), आधार कार्ड, एल. पी. जी. गॅस, रेशन कार्ड, महावितरण, पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ ), अन्न परवाना (एफ. डी.ए.), प्राधिकरण, एम.आय.डी.सी., पी.एम.पी.एम.एल. बस सेवा, माहितीचा अधिकार इत्यादी कार्यालयांच्या प्रतिनिधी/प्रमुखांकडून प्रश्नोत्तरे प्रमाणित करून घेण्यात आली आहेत, नागरिकांच्या दृष्टीने ‘सारथी’ व्हर्जन २’ नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही. व्हर्जन १ प्रमाणेच नवीन आवृत्ती माहितीपुस्तिका स्वरुपात प्रकाशित होईल. प्रथम मराठीत आणि पुढील १-२ महिन्याच्या अंतराने इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रती उपलब्ध होणार आहे. सामाजिक संस्था, शाळा, सार्वजनिक वाचनालय, महिला बचत गट, कंपन्या या सर्वांना या प्रती देण्यात येतील. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर ‘सारथी’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची योजना विचाराधीन आहे.

Dr. Shrikar Pardeshi (IAS)
Dr. Shrikar Pardeshi (IAS)

सारथी’वर काम करताना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव आम्हाला आला त्याचबरोबर समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा विचार करून सर्वसमावेशक योजना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि जाणीवेचा आम्हाला जवळून परिचयही झाला, काही निवडक अनुभव – हेल्पलाईन मध्ये फोन केल्यावर IVRS (म्हणजे मराठीसाठी १ दाबा, हिंदीसाठी २…) द्वारे भाषेची निवड, माहिती किंवा तक्रार याची निवड करण्याची सूचना मांडण्यात आली, परंतु अशिक्षित, झोपडपट्टीमधील लोक IVRS प्रणालीमुळे गोंधळून जातील तेव्हा फोन केल्यास थेट ऑपरेटरनेच फोन उचलला पाहिजे हे त्यांनी सांगितले. अश्याच एका मिटींगमध्ये DP Box विषयीच्या तक्रारींची जबाबदारी पालिकेची नाही या सुचनेवर पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पालिका म्हणून आपली बांधिलकी आहे तेव्हा महावितरण कार्यालयाशी अश्या तक्रारींचा पाठपुरावा पालिकेमार्फत व्हावा असे त्यांनी सांगितले. त्यांची Pro Citizen अशी झालेली प्रतिमा काय उगीचच तयार झाली नाही. त्याचबरोबरीने अधिकाऱ्यांच्या टीमचेही विशेष कौतुक करावेसे वाटते ‘सारथी’ प्रकल्पामुळे उत्कृष्ट टीम वर्कचा आदर्श त्यांनी देशातील अन्य महापालिकांसमोर ठेवला आहे. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आयुक्तांना भक्कम साथ अधिकारी, कर्मचारी वर्गाकडून मिळाली तसेच महापौर आणि पदाधिकाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले याचा उल्लेख जरूर करावासा वाटतो. नागरिक म्हणून आम्हाला एका चांगल्या सरकारी प्रकल्पाचा भाग बनता आले याचा विशेष आनंद!

जणू जवळच्या मित्राप्रमाणे ‘सारथी’ आज पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक नागरिकाला उपयोगी ठरत आहे, हा आपला मित्र कॉल ऑपरेटर, वेबलिंक, माहितीपुस्तिका, App, ई-बुक या विविधरुपात सध्या आपल्याला भेटत आहे. यापुढेही याच्यात बदल होत राहतीलही परंतु उत्तम मार्गदर्शक म्हणून तो त्याचे काम चोख बजावेल याचा मला विश्वास वाटतो.

‘सारथी’च्या बैठकीसाठी सुट्टीच्या दिवसात यावे लागले तरी टीममधील कोणाच्याही चेहरयावर नाराजी नव्हती प्रत्येकजण आजही येणाऱ्या प्रत्येक शनिवारची तेवढ्याच उत्साहाने आणि आतुरतेने वाट पाहतोय… जणू काही ‘सारथी’ला आणि त्याद्वारे पिंपरी-चिंचवड शहराला येत्या काळात थेट जागतिक पातळीवर नेउन ठेवायचेच असाच प्रत्येकाचा निर्धार असणार यात वाद नाही!

‘सारथी’ हेल्पलाईनचा वापर खालील प्रकाराने शक्य आहे:
1. कॉलसेंटर: 8888006666 (7 am to 10 pm)
2. वेबसाईट: www.pcmchelpline.in (FAQ वेबलिंक, माहितीपुस्तिका डाऊनलोड, Android Apple/iOS App, E-book हे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत)

अनमोल

महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

आठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने तिची आवड आणि आकांक्षा जपण्याचा निर्धार करत फरची खेळणी बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले, आत्मसात केलेले कौशल्य फक्त अर्थार्जनासाठी उपयोगात आणण्याचे आईने करून पाहिले पण मुळातच फक्त पैसा कमवणे हा विचार तिला कधी पटलाच नव्हता, आपले कौशल्य समाजातील गरजू महिलांना बहाल करण्याचा तेव्हापासून तिने जो सपाटा लावला तो आजही तसाच आणि सुरवातीपेक्षाहि अधिक व्यापक स्वरुपात सुरु आहे.

happy women's day

लोणावळ्याजवळच्या कामशेत या गावात क्लास घेताना इकीकडे संसार आणि आवड याचा ताळमेळ घालताना तिची तारेवरची कसरत होत होती, पण जिद्दीने तिने दुर्गम भागातील 100 मुलींना शहरात सहज मिळू शकेल अश्या कलेत पारंगत केले, जेव्हा तिथल्या मुलींचा फोन आईला यायचा त्यात मुलींच्या संसाराला आईने शिकवलेल्या गोष्टींचा हातभार लागतो आहे हे कानावर पडायचे त्याचा सगळ्यात जास्त आनंद तिला होत असणार ह्यात शंका नाही. सुरवातीस काहीसा विरोध नंतर प्रोत्साहन आणि सध्या अनेक कामांमध्ये मदतही अशी बाबांची आईच्या या कार्यातील भूमिका इथे मांडणे महत्वाचे वाटते. कामशेतनंतर तिने घरी अनेक क्लासेस घेतले, मी कॉलेजमध्ये असताना आणि व्यवहाराची थोडी अक्कल आलेली असताना आईला अनेकवेळा हे बोलल्याचे आठवते कि तू इतरांसारखी क्लासेसची फी का वाढवत नाही, यावर ती म्हणायची अरे या महिलांची परिस्थिती बघ, घरच्यांचा विरोध असताना त्यांना त्यांची आवड जपायची आहे आणि जास्त फी ठेवली तर घरचे त्यांना पाठवणारच नाही, मी चिडायचो तेव्हा, पण आज कळते कि पैसे जोडण्यापेक्षा माणसे जोडणे किती महत्वाचे आहे.

2004 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण क्लासेस घेणे सुरु केले. एव्हाना फर टॉंईजपासून सुरवात करून आईने फळ प्रक्रिया, ज्वेलरी, क्राफ्टची फुले, डेकोरेशन, रुखवत सजावट, सेंट अत्तर, इत्यादी दहाच्यावर कौशल्ये आत्मसात केली होती. साहजिकच पालिकेच्या या उपक्रमात आईने हिरीरीने भाग घेतला, गेली 9 वर्षे आई ह्या उपक्रमात प्रशिक्षक म्हणून सहभागी आहे, क्लासेससाठी पिंपरी-चिंचवडचा सर्व भाग तिने पालथा घातला. या कालावधीत तब्बल 1000 पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण आईने दिले. या प्रशिक्षण काळात तिला चांगले तसेच काही वाईट अनुभवही आले. 2010 साली प्रशिक्षण योजनेचे कंत्राट देण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय’ संस्थेने आईसोबत अनेक महिला प्रशिक्षकांचे मानधन रखडवले होते, 2 वर्षे उलटूनही जेव्हा संस्थेने मानधन देण्याबाबत टाळाटाळ केली तेव्हा तिने जिद्दीने त्याविरोधात संघर्ष केला, माहिती अधिकार तसेच पालिकेचा लोकशाही दिन या मार्गांचा वापर करत तिने पालिकेच्या अधिकाऱ्यांना महिला प्रशिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली. तिच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी संस्थेला निर्देश दिले कि जोपर्यंत प्रशिक्षकांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत सदर संस्थेच्या पुढच्या कोणत्याही कंत्राटावर सही मिळणार नाही. चेक मेट झालेल्या संस्थेला आईसमवेत अनेक महिलांचे मानधन द्यावेच लागले. तुमचे एकट्याचे काम करतो बाकी महिलांचे नंतर पाहू अशी संस्थेकडून आलेली ऑफर धुडकावून स्वतःबरोबर तिने तिच्या सहयोगी महिलांचे काम फत्ते केले… स्वतःच्या कष्टाचा आणि नियमाने मिळत असलेल्या मानधनावर का बरे पाणी सोडायचे हा या धडपडीमागाचा मूळ उद्देश.

2011 साली निगडी-प्राधिकरण परिसरात 7 बचत गटांची सुरवात करण्यात तिने पुढाकार घेतला. अनेक बचत गट सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले. बचत गटांमार्फत छोट्या छोट्या सामाजिक कार्यात भाग घेणे सुरु केले. परंतु बचत गट स्थापनेमागील मुख्य उद्देश तिला साध्य करता येत नव्हता. गरजू महिलांना रोजगार कसा मिळवून देऊ शकतो ह्याने तिला पछाडले होते. सुयश महिला बचत गटामार्फत तिने तिच्या महत्वाकांक्षेला लवकरच गवसणी घातली.

2012 साली आईने तिची भावजय (संध्या कर्णिक) आणि पुतणी (शीतल रणदिवे) यांच्यासोबत ‘सुयश’ महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना घराच्याजवळ रोजगार उपलब्ध करण्यासाठी लघु उद्योगाची सुरवात जुलै 2012 मध्ये निगडी-प्राधिकरण येथे करण्यात आली. कमी श्रमाचे आणि कमी जोखमीचे काम पिंपरी-चिंचवडमधील एका नामवंत कंपनीकडून सुयश बचत गटाला मिळाले. आजमितीस 30 महिलांना यातून रोजगार मिळतो आहे. विधवा, घरची परिस्थिती बिकट असलेल्या अनेक महिलांना आशेचा नवा किरण यामुळे मिळाला. या उद्योगात नियोजन, विक्री, मार्केटिंग या सर्व आघाड्या आईसमवेत मामी आणि बहिण अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसत आहे

सुयशबद्दल काही ठळक मुद्दे सांगायचे झाल्यास…

  • सुयश बचत गटाने उद्योगाची सुरवात करताना कोणतेही अनुदान घेतले नव्हते
  • बचत गटाच्या कामाची प्रगती पाहून स्वतः भगिनी निवेदिता बँकेच्या व्यवस्थापक आईला भेटल्या त्यांनी महिलांचे कौतुक केले, पगारासाठी सर्व महिलांचे बँक खाते उघडून सर्वांना डेबिट कार्ड देण्याची कल्पना त्यांनी आईजवळ मांडली, महिलांसाठी फायद्याच्या ह्या विनंतीला आईने लागलीच दुजोरा दिला त्यामुळे महिलांना २०१३ मार्चपासून पगार बँकेमार्फत मिळणे सुरु होईल.
  • पिंपरी-चिंचवड मधील ज्या कंपनीकडून काम मिळाले तिथे सद्यस्थितीत कंपनीच्या कामगारांपेक्षा सुयश महिलांच्या कामाचा दर्जा हा अधिक चांगला दिसून आला. चांगली गुणवत्ता आणि कामाचा उच्च दर्जा राखल्याबद्द्दल कंपनीच्या व्यवस्थापकांनी गटाचे कौतुक केले

सुयशमध्ये दैनंदिन कामाचे स्वरूप हे इतर उद्योगांपेक्षा वेगळे असते. महिलांकडून श्री सुप्त आणि इतर श्लोकांचे पठण रोजच्या रोज आई कटाक्षाने करून घेते, प्रसंगी एखादा चांगला लेख, माहिती त्यांना आवर्जून सांगितली जाते. वाढदिवस, महिलांचे पारंपारिक सण साजरा करणे यातून येथील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे असते. महिलानाम् उत्कर्षार्थम् कटिबद्धा: महिलांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध या आशयाची संकृतमधील ओळ आज सुयशच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला सार्थ ठरवणारी आहे.

माझ्या मते महिलांना रोजगार मिळवून देणे,त्यांना विविध कला शिकवणे यापेक्षाही मोठे काम आई करत आहे ते म्हणजे या सर्व महिलांना समाजात आत्मविश्वासाने कसे जगावे याचे शिक्षण जणू आई तिच्या कामातून देत आहे. महिला दिनाच्या दिवशी याबद्दल काही लिहूयात असे आजच डोक्यात आले, कमी वेळात जितके आठवले तेवढे इथे लिहिले. अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे ते पुन्हा कधीतरी इथेच अपडेट करेल. …धन्यवाद

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार 
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार
कर्तुत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर

Suyash Namaste 1

2012 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog.

Here’s an excerpt:

600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 5,700 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 10 years to get that many views.

Click here to see the complete report.

सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

आज्जीच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी रचलेल्या ओळी…

आभाळाएवढी उत्तुंग तुझी माया
परोपकाराचे दिलेस धडे आम्हाला
तुझ्या अगाध महिमेला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

अल्लड मुलगी होतीस कधी, झालीस संसारदक्ष पत्नी तू
आईचे ममत्व अन् आज्जीचा बटवा लेवून शोभतेस बरी पणजी तू
तुझ्या यशस्वी वाटचालीला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

परस्थिती होती बिकट जेव्हा आव्हानांचा डोंगर उभा
धीराने रचलास कुटुंबाचा एकसंध पाया तेव्हा
तुझ्या विलक्षण त्यागाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

चिडलो रागावलो तुझ्यावर आम्ही जरी
दुरावले कधीच नाहीस तू अंतरी
तुझ्यातील ममतेच्या झऱ्याला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

प्रत्येक गोष्टीवर तुझी चोख देखरेख असायची
हरवायची काही सोय त्यामुळे आम्हा नसायची
तुझ्या आज्जीदक्ष स्वभावाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला

तुझ्याबद्दल सांगताना मज शब्द अपुरे पडले
चांदण्या रात्रीत माझे मलाच गहिवरून आले
मग हळूच मान वर करून चंद्राकडे पहिले
खर सांगतो आज्जी…
सहस्त्र दर्शनाने तुझ्या, त्याचे भारावलेले रूप मला दिसले!

आणि मग पोस्टरची कल्पना सुचली… फोटोचे डिझाईन माझेच फक्त Coral draw साठी एकाची मदत घेऊन प्रत्यक्षात उतरवले…

माझी छकुली

आई बाबाची सुंदर परी
नाजूक हसरी गोड गोजिरी

केसांची बट जेव्हा हळूच डोळ्यांसमोर येते
टपोरे डोळ्यांची जोडी आतून छान लुकलुकते

तिचे घरभर दुडू दुडू रांगणे, चुटू चुटू बोलणे
हरखून टाकणारे खट्याळ वागणे आणि नटखट हसणे

किती ग गोंडस तुझ्या गालावरची खळी दिसते
रागावली कि मात्र चिमुकल्या ओठांचा चंबू करून बसते

भरवताना मऊ-मऊ दुधभाताचा घास
चिऊ काऊशी तिची जमली गट्टी खास

दिवसामागून दिवस कसे भुर्रकन उडाले
तिच्या भोवतालच्या जादुई दुनियेत मीच हरवून गेले

तिच्या संगतीतला प्रत्येक क्षण म्हणजे मेजवानी
त्यातच मिळते तिच्या गोड गोड पप्पीची मिठाई

छकुलीसाठी माझ्या, देवी माते एक वर दे,
तिचे खूप मोठे नाव होऊ दे,
यश, कीर्ती आणि चांगले आरोग्य तिला मिळू दे…

– अनमोल

[एक छोटीशी सूचना… आई बाबा आणि छकुली या शब्दांच्या जागी तुम्ही तुमची खरी नावे वापरून हा शुभेच्छा संदेश शुभेच्छा पत्रावर, फोटोमध्ये, फेसबुकवर पाठवू शकता 🙂 …तुम्हाला वरील ओळी कश्या वाटल्या नक्की कळवा…]

मैं परेशान

नुकताच दहावीचा निकाला लागला, हुश्शsss सुटलो बुवा… काहिशी अशीच प्रतिक्रिया अनेकांची असणार (माहितेय, पुढच्या बेंच वरचे सो कॉल्ड टॉपर लोक वगैरे सोडून) …निकालानंतर सगळीकडे आनंदीआनंद असतो पण परीक्षेच्या आधी वर्षभर वातावरण वेगळेच दिसून येते. दहावीच्या परीक्षेला घरच्यांनी जणूकाही लढाईचे स्वरूप आणलेले असते, अश्या या लढाईत पालकसेनेकडून उतरलेल्या या बाल सेनापतीवर सर्व दिशेने प्रश्नांचा भडीमार होऊन लढाई सुरु होण्याआधीच त्याला नामोहरम केले जाते… यामुळेच कि काय कधी कधी गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय त्याला शत्रू वाटू लागतात, स्पर्धेच्या या जगात  सदैव पुढे राहण्याचा पालकांचा आग्रह मान्य, पण टोकाच्या अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादणे बरोबर नाही, पालकांच्या आणि समस्त नातेवाईकांच्या दहावी, बारावीबाबतच्या आतताईपणामुळे हाच बाल सेनापती आपली सर्व अस्त्रे गाळून पुढच्या आयुष्यातील खरी लढाई जिंकण्यासाठी मनातून पार ढासळून जातो…

मैं परेशान, एका हिंदी गाजलेल्या गाण्यातील शब्द थोडेसे ट्विस्ट करून, मनात कधी ना कधी अभ्यासाविषयी निर्माण झालेल्या वैतागाविषयी खरडण्याचा प्रयत्न

नए नए पन्ने किताबोंके क्यूँ सताते मुझे 
नए नए  सब्जेक्ट्स क्यूँ करने लगे इस कदर तंग मुझे

जरा जरा पढ़नेसे सोने लगा दिल मेरा 
जरा जरा टेन्शनसे दुखने लगा सिर मेरा  

मैं परेशान परेशान परेशान परेशान

मँथ्सका नाम न लेना…
सायन्ससे मैं हूँ खफा…
हिस्टरी एक बुरा सपना…  
जिओग्राफीका कुछ नहीं पता…

मैं परेशान परेशान परेशान परेशान
एक्जाम है सजा…!