पुन्हा मन विचारांच्या गर्द डोहात झेपावले…
अन् नात्यांचे न सुटणारे कोडे उलगडू लागले…
हळू हळू शिरकाऊ पाहत आहे इथे राजकारण
का असत्यालाच दिले जात आहे महत्व अकारण?
चाली वर चाली, अहो आहे का हो हि राजनीती
चोराला सोडून संन्याशाला फाशी हि कैसी नीती?
शून्य आहे यांच्याकडे विचारांची परिपक्वता
मग उगीचच मोठे असल्याचे बिरूद कशाला मिरवता?
वंदितो अवघा समाज, कारण तयाचे परोपकार
त्यांनाच यावी उपेक्षा वाटयाला, हेच मुळी कसे पटणार?
वाटले होते आत्ताच कुठे सुरु झाले आनंदपर्व
पण का बरे खो घालण्यास तयार आहेत हे सर्व?
काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची
काही जन्मो जन्मीची, तर काही सुख-दुखाची
हे सारं अगदी खरय ना?
मग देवा कोडे न सुटण्याचे एक तरी कारण दे ना…
अनमोल…