My Memorable 25th

Happy Birthday अमोल, असे रात्री १२ वाजता mobile वर सर्वात प्रथम ‘तीचे’ शब्द कानावर पडले आणि नकळत मनामध्ये आनंदाची एक लहर येऊन गेली. Birthday… नाही नाही Happy Birthday असतोच मुळी असा. नातलग, मित्रमंडळी  यांचे येणारे SMS, फोन यामुळे एक वेगळाच उत्साह संचारतो, मग हळुच नजर Facebook आणि Orkut वरच्या शुभेच्छा संदेशांवर जाते आणि उगाचच आपला भाव वाढल्यासारखा वाटतो.
आज काय विशेष? असा नातलगांचा तर पार्टी कुठे? असा मित्रांचा प्रश्न ठरलेलाच असतो. दिलदारी दाखवायला यापेक्षा योग्य दिवस तो कुठला?
तर यंदा घरच्यांसोबत वाढदिवस Enjoy करण्याचा plan आहे, @मित्र  Party for sure पण नंतर कुठल्यातरी दिवशी ठरवू…
अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिली, आज नकळत आठवण झाली ती बरोबर एका वर्षापूर्वी याच दिवशी कंपनी च्या project  साठी  औरंगाबादला असताना वाढदिवसाचे मला एक Great surprise मिळाले होते… त्यावेळेला तो surprise प्रसंग मी  शब्दबद्ध केला होता… आज तोच इथे मांडत  आहे, नक्की वाचाल हि अपेक्षा
——–My Memorable 25th————————————————————————————-7/4/10
A Big THANK to all my Bros for making my 25th birthday such memorable DAY…!

Due to professional commitments for very first time I was away from my family on my Birthday.

I would take a chance to tell you that incident which was happened on 7 April 2010 in Aurangabad. The whole day I was busy in meetings, project work, Discussion so couldn’t even think how would be the celebration tonight. Around 12 noon I have received a call from UD (Uday dada). He was asking my company address as he want to send me gift through courier. Then Dad’s turn He asked me to stay back at guest house after company and wait for one call (I thought, dad might have told his friend to take me to any hotel)

I had left company around 8.30 pm and went to guest house. Waiting ceremony last till 9.30 pm. meanwhile few calls from Dad just to ensure that I am in guest house. Around 9.45 UD called me again. This time he told me that Courier boy couldn’t find my address so suggested me to come at nearby place. Near to my guest house there is one famous Ganapati temple. It took me 10 minutes to reach at temple.

Where is that Courier Boy?

Suddenly from my right one car came near to me. On closely observing……Voila!! These are my Bros!! Surprise!!                                                                                                                   “I can’t believe it” this was the reaction when I saw them

Finally got into the car and slowly slowly tried to explore the plan…                                Abhay dada: Original idea and also cancelled one meeting.                                                  Uday dada: Fully supported despite of one tragedy (later I came to know before leaving Pune he mate with an small accident).                                                                                    Sameer: All the way from company (and yes next day he has to attend meeting in the morning).                                                                                                                                     Harsh: Sacrificed study time (next day there was practical scheduled for him).               Dad: Actor in supporting role (Not to forgettable, on that day around 4 AM he had sent me one nice SMS).                                                                                                                               Aai: Told me that we will definately celebrate your Birthday but never disclosed the details (really missed the ‘Oaukshan’ from you and Ajji)                                                                         Rest all: Indirectly supported the plan. (Thanks…)

Afterwards we headed toward Beed bypass as we already got information regarding resort ‘Madhuban’ from Sameer’s grandfather (Bhalu kaka). Party last till 1 AM and then all started (except me) moving back to Pune.

——–My Memorable 25th————————————————————————————-7/4/10

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ई-साहित्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ई-साहित्य, बुकगंगा या website च्या सौजन्याने अगदी मोफत उपलब्ध आहे.  आनंदाची बातमी लागलीच मित्रांपर्यंत पोहोचणे माझे कर्तव्यच नाही का?
शाळेत असताना सावरकर दिन हा विशेषत्वाने साजरा केला जायचा. निबंध, गायन, वकृत्व अश्या अनेक स्पर्धातून आम्हाला तेव्हा सावरकरांचा परिचय होत असे. दहावीत अश्याच एका गायन स्पर्धेत माझ्या गटाने सावरकरांचा पोवाडा सादर केला होता. मस्त सादरीकरण झाले होते पोवाडा म्हणताना एक वेगळेच स्फुरण चढले होते. कालौघात तो पोवाडा विसरलो. बघुयात तो पोवाडा मला बुकगंगा वर सापडतो की नाही…
 
ebook download करण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रेम हे असे का असते…

Happy V'day

प्रेम हे असे का असते..
कि सारे उमजुनही न उमजण्यास भाग पाडते
प्रेम हे असे का असते..
ज्यात कोणाची वाट पाहणे अगदी हवे हवेसे वाटते
प्रेम हे असे का असते..
कधी आठवणीच्या गर्दीने पूर्ण रात्र व्यापून टाकते
प्रेम हे असे का असते..
जे अडचणींशी सामना करण्याची उर्मी देऊन जाते
प्रेम हे असे का असते..
जे भर उन्हात सुद्धा एक वेगळाच थंडावा देते
प्रेम हे असे का असते..
ज्यात निकाला पेक्षा परीक्षा देण्याचेच टेन्शन अधिक असते
प्रेम हे असे का असते..
जे गडबड गोंगाटातही मनात मधुर सूर आळवते

जाऊ द्या ना…
प्रेम हे असेच असते
ज्यात पडण्यात खरी मजा असते 🙂

अनमोल…

आपण गोष्टी का सांगतो?

युष्यात आलेल्या विविध अनुभवातून आपण काही ना काही शिकत असतो आणि मग प्रेरित होऊन इतरांना आपले अनुभव सांगतो. गोष्टीं च्या माध्यमातून अश्या कथनात रोचकता भरली जाते आणि वाचक/श्रोता आशयाशी जवळीक साधू शकतात. सोप्या भाषेत वाचक/श्रोता आवडीने वाचतात/ऐकतात. Customer वर्गाला आकर्षित करायचे असेल तर त्यांना गोष्टी रूपाने उत्पादनाविषयी सांगा असे Sale Management शिकवते.
हाजालावर उपलब्ध असलेल्या आणि इमेल वर मिळालेल्या अश्या अनेक छोटया छोटया गोष्टी मी तुमच्या बरोबर इथे share करणार आहे. Manuscript (हस्तलिखित) या विभागात या गोष्टी वाचायला मिळतील आणि हो इथे भाषा माध्यम हे इंग्रजी व  मराठी असणार आहे.
 
विषयाशी संबधित पहिली गोष्ट:
“Why we tell Stories”
  
There was once a disciple of a great teacher. Day after day the disciple would sit at the feet of his teacher listening to his instruction. Many people would come to visit and inevitably the teacher would engage them by telling a story.

 

 

One day the disciple asked; “Guru, why do you engage people by means of stories? Why don’t you just give them your teaching straight out?”

 

The guru answered: “Bring me some water.”
Now the disciple knew his teacher to be a very formal and disciplined man. He had never asked for water at this time of the day. Nevertheless, he went immediately to fetch it. Taking a clean brass water pot from the ashram kitchen, the disciple went to the well, filled the pot with water and returned. He offered it to his teacher.

 

“Why have you brought me a pot when I asked only for water?”

 

The moral of this story…

 

We share with others the lessons we have learned. We provide them with a banquet of various tastes and styles. It is up to the person to choose that dish which they find most palatable.  

(Source: Cognizant Mailer)

नांदिवली एक गाव

कधी कधी धकाधकीच्या जिवनातून जरा उसंत घेऊन थोडासा वेळ दुसरयांसाठी काढला की मनाला एक वेगळाच आनंद मिळून जातो, होय ना…? कृत्रिम  हसणे  सभोवताली  नेहमीच  बघतो  पण निरागस, अल्लड हसणे काय असते याचा प्रत्यय मला नुकताच नांदिवली मध्ये आला. माझे गाव ‘नांदिवली’. पुण्यातून पौड रस्त्याने तसेच पिंपरी-चिंचवड  मधून  हिंजवडी  मार्गाने  माझ्या  गावाला  येता  येते. अंदाजे ६० km अंतर असावे. थोडक्यात  परिचय,  नंतर  कधीतरी  नांदिवली, मुळशी विषयी बोलूच.

नांदिवली गाव

मुळशी परिसराचे काही विहंगम दृश्ये

आत्ता मला गप्पा मारायच्या आहेत त्या ९ जानेवारी २०११ रोजी  पार पडलेल्या कार्यक्रमा विषयी:
हा दिवस म्हणजे आजोबांचा (अण्णा) जन्मदिवस तसेच ६ वर्षांपासून जयंती दिवस, याच  दिवसाचे  औचित्य साधून आणि गावाविषयी  असलेल्या  आजोबांच्या  आत्मीयतेचा  वसा  पुढे  चालवताना  आम्ही   देशपांडे कुटुंब शाळकरी मुलांना प्रोत्साहनपर साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आखतो.

वर्ष ६ वे:
गावामधील शाळा हि इयत्ता पाचवी पर्यंत भरली जाते. शाळा तशी लहान, सगळे विद्यार्थी मिळून १४ आणि एक गुरुजी. रविवार च्या दिवशी गुरुजी आणि ग्रामस्थांच्या  मदतीने  कार्यक्रम  नियोजित  वेळी  सकाळी  १० वाजता सुरु झाला. गुरुजींना कार्यक्रम  मला कसा अपेक्षित आहे हे थोडक्यात सांगितले.

स्थळ- वर्गकक्षा, नांदिवली गाव
गुरुजींनी प्रास्ताविक दिल्यावर मुलांनी एका सुरात पद्याने कार्यक्रमाची सुरवात केली. गुरुजींनी पाहुणे  आणि वरिष्ठ गावकरी मंडळींची ओळख करून दिली आणि मला दोन  शब्द बोलण्याचा आग्रह केला. नवीन लोक समोर असल्याने मुले जरा बावरलेली दिसत होती. काय बरे बोलावे? नुसतेच मौलिक
सल्ले देण्यापेक्षा यांच्याशी जरा हलक्या फुलक्या गप्पा मारल्या तर नक्कीच मुले खुलतील.

मी: मुलांनो आता तुम्ही मला तुमचे नाव इयत्ता तसेच आवडीची एखादी गोष्ट सांगायची
मुले: (अजूनही बावरलेले)
मी: तू उभा रहा, नाव काय तुझं ? इयत्ता कुठली?
मुलगा: गणेश…अं… इयत्ता पहिली
मी: काय आवडते तुला?
मुलगा: (नुसताच हसून)
मी: एखादा पदार्थ, वस्तू, पक्षी, प्राणी काही पण जे आवडते ते सांग
तो: कावळा
इतर  मंडळी: (खो खो हसून)
मी: …!! (मनात…कावळा का बरे? विचार करता असा अनुमान काढला की एकतर  कावळ्यांची  सभोवतालची असलेली विपुल उपलब्धता आणि घरोघरी असलेला समज की कावळा ओरडला म्हणजे पाहुणे येणार आणि मुलांसाठी पाहुणे म्हणजे खाऊ पर्यायाने आनंद…वा वा स्वतःलाच शाबासकी  देत)
मी: तू सांग
ती: मला मेथी
तो: चिक्कू
तो: चिंच
मी: चिंच! चोरून  खायला आवडते का? (…रम्य ते बालपण, …रम्य त्या केलेल्या पेरू, कैरी, आवळा  आणि चिंचेच्या चोरया  😉 )
मी: मोठयाने बोल
तो: (दबक्या आवाजात) मला पण कावळा…
इतर  मंडळी: (परत खो खो हसून)
ती: पालक
माझे बाबा: पालक म्हणजे भाजी की आई बाबा?
ती: भाजी…
इतर  मंडळी: (फिदीफिदी  हसून)
(अश्या प्रकारे सगळ्या मुलांची ओळख परेड पार पडली आणि बर का मुले एव्हाना समरस झाली होती.)

माझे छोटेखानी भाषण:
(इशारा: छोटेखानी भाषणाचे शब्दांकन हे अतीव छोटेखानी आहे त्यामुळे चिंता नसावी)
मी: “मुलांनो आज आपण इथे जमलो आहे ते माझ्या आजोबांच्या ६ व्या जयंती निमित्त. तुम्हाला  प्रश्न पडला असेल की का बरे हे लोक दरवर्षी येतात आणि आपल्याला  काहीतरी भेट देऊन जातात? ते केवळ तुम्ही शिकत आहात याला प्रोत्साहन मिळावे यासाठी. मुलांनो तुम्हाला माहित असेलच आपल्या  गावाजवळ सहारा  (Amby valley, २०-२५ km अंतरावर) नावाची  मोठी  कंपनी आहे. दहावी बारावी  पास असाल तर तिथे तुम्हाला सहज नोकरी मिळते. या  गावातील  तुमच्या  आधीच्या लोकांनी शिक्षण मधेच सोडले आणि सुवर्ण संधी गमावली (सत्य परिस्थिती). तुम्ही अशीच  जर शिक्षणाची संगत ठेवली  तर नक्कीच लोक तुम्हाला प्रोत्साहन म्हणून  अधिक चांगल्या चांगल्या भेटवस्तू देतील (शिक्षणासाठी आमिष). तर मग, मुलांनो  शिक्षणाची संगत कायम  ठेवणार ना?”
मुले: होssss

साहित्य वाटप कार्यक्रम:
येथून पुढे मुख्य असा साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरु झाला. यंदा मुलांना स्वेटर, शालोपयोगी वस्तू आणि खाऊ म्हणून बिस्कीट अश्या जिनसा दिल्या.

इथे कार्यक्रमाची क्षणचित्रे पहा

गुरुजींनी मग माजी सरपंचांना बोलायची विनंती केली, त्यांचे  बोलणे संपते ना संपते तोच उत्साहाच्या भरात समारोपाचे दोन शब्द बोलताना अचानक  एक  बॉंब टाकला…!!                             गुरुजी: (माझ्या वडिलांना निर्देशून) “काकांनी त्यांच्या  वडिलांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम केला, मुलांनो उद्या तुमचेही  वडील जाणार तेव्हा असाच कार्यक्रम तुम्ही सुद्धा करावा”  (आम्ही सगळे अवाक आणि निरुत्तर #!@*^?)

|| इति श्री नांदिवली ग्रामे कथा समाप्त  ||

[ता. क.: स्वेटर, साहित्य, खाऊ  खरेदी  तसेच  आलेल्या  पाहुण्यांची  चहा  नाश्त्याची  सोय  अश्या  महत्वाच्या आघाडया आई बाबांनी सांभाळल्या. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अश्या समाजोपयोगी  कृतींना अधिकाधिक बळ मिळते]

नाते आपुल्या दोघांचे…

सौख्य प्रीतीचे,
बंध रेशमाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!

जणू आकाशाचा निळाशार पसारा,
जणू नदीचा शांत किनारा,
जणू काजळाची गर्द छाया,
जणू धुक्यात हरवलेल्या वाटा,
चाहुली ह्या अश्या कित्येक, आज भासवी मला

भावना अश्या ओथंबलेल्या…
जिव्हाळाच्या त्या निवांत क्षणी…
स्पर्शाने चिंब भिजलेल्या…
वाटेवरील त्या कोमल आठवणी…
जपावे चिरकाल हे सारे, मन म्हणाले मला

हृदयातील सप्त सुरांचे,  
मन-मनातील  भावविश्वाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!

अनमोल…

मराठी पाऊल पडते पुढे

एक आगळा वेगळा कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’  लवकरच तुमच्या समोर झी मराठी घेऊन येणार आहे. मला कल्पना आवडली त्यामुळे माझ्या एका ब्लॉगर मित्राच्या ब्लॉग वर प्रसिद्ध केलेले आवाहन मी इथे देत आहे. एकदा नजर फिरवा.

आवाहन:

नमस्कार मित्रहो !

फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ‘ श्रीप्रसाद क्षीरसागर’ अशी फोनवर ओळख दिली तेव्हा ” कोण ? ” हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.

आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. ” आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ” ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्‍या मराठी कलाकाराच्या शोधात. “झी मराठी” सोबत हा प्रवास सुरु होतोय “मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर…. प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर… श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर… “ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला”.

तुम्ही काहीही वेगळं करत असाल… गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही…. आग़ळं वेग़ळं अस काहीही…. त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय…

३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर – ” – -” –
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००

ईमेल – shabashmaharashtra01@gmail.com

तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्‍या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.

मायबोलीवरील आवाहनाचा दुवा

तुमचाच
कौतुक शिरोडकर

******************************************************************************************

तुमच्या मधील अंगगुणांना वाव दयायची मस्त संधी आहे, दवडू नका…
– अमोल देशपांडे 

ते फूल होते एकटे

ते फूल होते एकटे
कड्या कपारी मध्ये उभे ठाकलेले
रुक्ष सम वनात डौलात झुलणारे…ते फूल होते एकटे
झेलत लहरी पावसाच्या
वारयाशीही दोन हात करणारे…ते फूल होते एकटे
बघताच मन प्रफुल्ल करणारे
नव्या उमेदीची झालर देणारे…ते फूल होते एकटे
अखंड प्रयास रुक्षता मिटवण्याचा
पण चुणूक त्यास असंभवतेची
कारण मित्रा…ते फूल अजूनही आहे एकटेच…!
अनमोल…
————————————————————————————————————————————————————-
[कवितेच्या माध्यमातून समाज सेवकाची जीवन गाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, अर्थात कवितेची ही चार कडवी समाज सेवकाच्या  व्यापक कार्यक्षेत्राला सामावू शकत नाही. माझे भाग्य आणि  आनंद  इतकाच की केलेली पहिलीच कविता ही  ‘समाजसेवा’ या विषयाशी निगडीत आहे. काही कारणास्तव कविता उशिराने प्रकाशित  करत  आहे]
सारांश…
कडवे १: समाज सेवकाचे  समाजामधील  स्थान,  स्थान म्हणाल तर अतिशय दुर्गम.
कडवे २: त्याच्या  वाट्याला  आलेली  प्रतिकूल  परिस्थिती  आणि  अश्यातही परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याच्या अंगात असलेली उर्मी. तग धरून राहिल्यानेच हा इतरांसाठी मार्गदर्शक बनू  शकला.
कडवे ३: नवी उमेद, नवी आशा, जगण्यातील आनंद अश्या कित्येक गोष्टी हा इतरांना वाटत असतो.
कडवे ४: शेवटी मला ठळक पणे  नमूद करावेसे वाटते कि भोवतालची परिस्थिती बदलायला निघालेला, द्रुढ निश्चयी असणारा, अडचणींना  न  जुमानणारा असा  हा इथे मात्र हतबल होतो  कारण आज तो एकटाच झगडतो आहे आणि समोर कामाचा व्याप प्रचंड आहे.
मित्रा असे संबोधून तो तुमच्याजवळ अत्यंत कळकळीने विनंती करतो आहे “सहभागी व्हा…साथ द्या…!”  “Join us…Support us…!”
————————————————————————————————————————————————————-

शुभेच्छा संदेश

१२ डिसेंबर, बाबांचा 53rd वाढदिवस…झटकन केलेला शुभेच्छा संदेश

वर्ष नवे, उल्हास नवा,
आकांक्षा आणि उमेदही नवा,
अश्या नव्याच्या नवलाईसाठी
आणि आयुष्याच्या नव्या inning साठी
आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा…!
————————————————-

मग हाच संदेश मी स्वतःच्या अक्षराने greeting card वर खालीलप्रमाणे लिहिला…

वर्ष नवे, उल्हास नवा,
आकांक्षा आणि उमेदही नवा,                    
अश्या नव्याच्या नवलाईसाठी          
आणि आयुष्याच्या नव्या inning साठी  
आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा..!

प्रेरणा

तुझ्यासाठीच रचली होती चारोळी जेव्हा,
उमगले जणू काहितरी जमतेय तेव्हा
जुळले एकमेकांत शब्द अन् भावना जेव्हा,
ठरवले मनाशी लिहायचेच तेव्हा

माझ्या ब्लॉग लिहिण्यामागची प्रेरणा:
निमित्त होते तुला दिवाळी च्या शुभेछा देण्याचे आणि sms स्वतःच compose कर अशी तुझी अट घालण्याचे
वाटले की विचारावे मित्राला दे एखादा sms forward करायला, पण हळूच विचारले मनाला जमेल का बुवा आपल्याला
सायंकाळी कट्टयावर होतो बसून अन् भोवताली मित्रमंडळी, कस्स काय पण नकळत सुचल्या त्या चार ओळी
मन म्हणाले वा रे पठ्या जमल की रे, कधी नव्हे ते तू आज केलस की रे
आता मात्र ठरवल आपला पण असावा ब्लॉग , जिथे असेल माझ्यातील मनोविष्कारास जाग!

कोणासाठी?  कशासाठी?
लिहावे काय?
मिळेल का वेळ? मनात असे नानाविध प्रश्न…
ठरवले मनाशी बघू सुरवात करून, नाहितरी कोणी ठेवले आहेच ना लिहून
|| केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ||

अनमोल…

[नोंद: केलेला शुभेछा संदेश (चारोळी) तसेच माझ्या ब्लॉग मधिल पहिले लिखाण इथे पाहू शकता]